शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

घरकुलाचे स्वप्न कागदावरच

By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागात मातीच्या कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्यांना पक्के घर मिळावे, यासाठी शासनाने राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरू केली.

उस्मानाबाद : ग्रामीण भागात मातीच्या कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्यांना पक्के घर मिळावे, यासाठी शासनाने राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरू केली. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात बँक आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना पूर्णत: बारगळली असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेने राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविलेल्या ३ हजार ७५५ प्रस्तावांपैकी मे २०१४ अखेर केवळ ३४९ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, तब्बल २ हजार ९६५ प्रस्तावांत वेगवेगळ्या त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ही राज्य शासन पुरस्कृत असून, शासनाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार १७५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. या अनुषंगाने ४ हजार २९५ लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव दाखल केले होते. यातील ३ हजार ७५५ प्रस्ताव जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडून विविध बँकांकडे दाखल करण्यात आले होते. परंतु, संबंधित बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जवळपास एक वर्षांचा कालावधी झाला तरीही अद्याप केवळ ३४९ प्रकरणांनाना मंजुरी मिळू शकली. उर्वरित २ हजार ९६५ अर्जांमध्ये बँकांनी त्रुटी काढून परत केले असून, ४३० प्रकरणे बँकांकडे अद्याप प्रलंबित आहेत. उस्मानाबाद तालुक्यातून ९३३ प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकांकडे दाखल केली होती. परंतु, मेअखेर १७७ प्रकरणे मंजूर, ७४८ प्रस्तावांत त्रुटी तर १६ प्रकरणे प्रलंबित आहेत. अशीच परिस्थिती लोहारा तालुक्यात आहे. या तालुक्यातील २६१ प्रकरणे बँकेकडे सादर केली असता केवळ ३२ जणांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उर्वरित १४ जणांचे प्रस्ताव बँकेकडे प्रलंबित आहेत. वाशी तालुक्यातूनही ४४६ परिपूर्ण प्रस्ताव बँकेकडे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आजवर ३७ प्रकरणांनाच बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित ३९० प्रस्ताव त्रुटींत अडकले तर १४ प्रकरणे बँकेकडे धूळखात पडून असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले. ग्रामीण यंत्रणेकडून कळंब तालुक्यातील ६१९ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. आजपर्यंत केवळ यातील केवळ ४४ लाभार्थ्यांनाच घरकुलासाठी निधी मंजूर झाला आहे. उर्वरित २५ जण घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. भूम तालुक्यातील ३२८ प्रकरणे बँकांकडे सादर करण्यात आली होती. यातील २५ प्रकरणेच मंजूर झाली आहेत. तुळजापूर तालुक्यातही २६ प्रकरणे मंजूर आहेत. उमरगा तालुक्यात एकही घरकुल मंज़ूर झाले नाही. (प्रतिनिधी)तालुकानिहाय घरकुलाची स्थितीतालुकाउदिष्टमंजूर प्रकरणेप्रलंबित प्रकरणेउस्मानाबाद४८३ १७७१६तुळजापूर३५०२६११उमरगा३३५००००लोहारा१९०३२१४वाशी१६५३७१४कळंब२८६४४२५भूम१७२२५९२परंडा१९४०८२५८