शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

जालन्यातील नाट्यचळवळ थंडावलेलीच

By admin | Updated: August 26, 2015 00:46 IST

गजेंद्र देशमुख , जालना गत काही वर्षांपासून जालना शहरातील नाट्य चळवळ थंडावली असून, विविध माध्यमांमुळे होत असलेली करमणूक व दर्जेदार नाट्य संचांनी पाठ फिरविल्याने ही

गजेंद्र देशमुख , जालनागत काही वर्षांपासून जालना शहरातील नाट्य चळवळ थंडावली असून, विविध माध्यमांमुळे होत असलेली करमणूक व दर्जेदार नाट्य संचांनी पाठ फिरविल्याने ही चळवळ थंडवण्यासोबतच प्रेक्षकांतूनही नाटकाची गोडी कमी होत असल्याचा सूर वाचकांतून निघाला. जालना शहरातील नाट्य चळवळ थंडावली का? या विषयावर लोकमतने प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. जालना शहरात नाट्य चळवळीस चांगला इतिहास आहे. नाट्यांकूरसह अनेक संस्था एक पात्री तसेच बहुपात्रांच्या माध्यमातून शहरवासियांची नाटकांची भूक भागवत आहे. काही छोट्या मोठ्या संस्थाही नाट्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घनसावंगी तालुक्यातील डॉ. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या नाटकाने राज्यात शबासकी मिळविली. कैलास वाघमारे, वैशाली दाभाडेसह विविध उदयोन्मुख कलाकारांनी नाटकांच्या माध्यमातून चित्रपटाचे व्यासपीठ मिळविले. परंतु गत काही वर्षांपासून जालनेकरांसोबतच फुलंब्रीकर व आंबेडकर सभागृहानांही दर्जेदार नाटकांची प्रतीक्षा आहे. नाट्य चळवळीबाबत वाचकांची मते जाणून घेण्यासाठी एक विशेष सर्वेक्षण करण्यात आले. यात पाच पर्यायी प्रश्न विचारून उत्तरे घेण्यात आली. जालना शहरातील सांस्कृतिक व नाट्य चळवळ थंडावली का? यावर ६५ टक्के वाचकांनी होय असे उत्तर दिले तर २० टक्के चळवळ थंडावली नसल्याचे म्हणतात. १५ टक्के वाचकांनी माहिती नाही असे सांगितले. चित्रपट व मल्टीप्लेक्समुळे काहीअंशी फरक पडल्याचे ६० टक्के वाचक सांगतात. नवीन कलाकारांची कोंडी होत असल्याचे ६० टक्के वाचक सांगतात. दरम्यान, नाट्यचळवळ जीवंत ठेवण्यासाठी कार्यरत संस्थांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन जालन्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे, असा सूरही निघाला.