शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पुनर्वसित गावांच्या विकासात अधिकाऱ्यांचा खोडा

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

लालखाँ पठाण , गंगापूर तालुक्यातील २३ पुनर्वसित गावात १०८ कामांसाठी ५ कोटी ११ लाख ८ हजार ५३९ रुपयांची मंजुरी मिळाली; मात्र संबंधित अधिकारी या विकास कामात चालढकल करीत

लालखाँ पठाण , गंगापूरतालुक्यातील २३ पुनर्वसित गावात १०८ कामांसाठी ५ कोटी ११ लाख ८ हजार ५३९ रुपयांची मंजुरी मिळाली; मात्र संबंधित अधिकारी या विकास कामात चालढकल करीत असल्याने अनेक गावातील कामे अर्धवट, तर काही कामांचा निधी अडकून पडल्यामुळे निधी असूनही विकासकामे ठप्प झाली आहेत.पुनर्वसित गावांमध्ये गावपोच रस्ता, स्मशानभूमी पोच रस्ता, स्मशान शेड बांधकाम, अंतर्गत रस्ते, सिडीवर्क, विंधन विहीर, ग्रामपंचायत कार्यालय आदी कामांसाठी विविध पुनर्वसित गावातील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी कामे करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जायकवाडी प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन झालेल्या एकूण गावांसाठी एकूण ५ कोटी ११ लाख ८ हजार ५३९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील बहुतेक कामे सुरू करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी नुसते कॉलम उभे आहेत. गळनिंब येथे बेसमेंटसाठी आलेले साहित्य गायब करण्यात आले. जामगाव येथे कामे दाखवून रक्कम उचलण्यात आली. भिवधानोरा येथे बोअर घेतले नाही. सावखेडा येथे दर्जाहीन स्मशानभूमी शेड उभारण्यात आले. पुनर्वसनानंतर जवळपास ४५ वर्षे उलटली, तरीदेखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. नाममात्र मोबदला घेऊन ग्रामस्थांनी आपली घरेदारे, शेतीवाडी शासनाच्या स्वाधीन करून गावे सोडली. वास्तविक पाहता जी गावे जायकवाडी प्रकल्पात आरक्षित झाली, त्या गावांना मूलभूत सेवा देणे, सुविधा पुरविणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असताना शासनाने याकडे पाठ फिरविली.पुनर्वसित गावांमध्ये पिण्याचे पाणी, शाळा, इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, गुरांचा दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतर्गत रस्ते, गावपोच रस्ता, स्मशानभूमी ही कामे करणे गरजेचे होते. या मूलभूत गरजा आणखी किती वर्षांनी पूर्ण होतील, असा सवाल पुनर्वसित गावातील सरपंच शांताबाई खटावकर (पखोरा), मुक्ताबाई शिंदे (भिवधानोरा), अण्णासाहेब सुखधान (आगरवाडगाव), कैलास नरोडे (लखमापूर) आदींनी केला. आगरवाडगाव, पखोरा, लखमापूर, गळनिंब, भिवधानोरा, आगरकानडगाव, अंमळनेर, बगडी, गणेशवाडी, हैबतपूर, जामगाव, कायगाव, कोडापूर, महालक्ष्मीखेडा, मांडवा, ममदापूर, नेवरगाव, पुरी, सावखेडा, शंकरपूर, तांदूळवाडी, वझर, झांझर्डी पुनर्वसन गावातील मंजूर झालेल्या विकासकामांचा निधी मिळावा या करिता पुनर्वसन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत.-अप्पासाहेब पाचपुते, सदस्य, पुनर्वसन समिती.