शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

By | Updated: December 4, 2020 04:07 IST

उच्चशिक्षण : तीन वर्षांत मिळणार ७५ हजार ‘युरो’ निधी -- औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ...

उच्चशिक्षण : तीन वर्षांत मिळणार ७५ हजार ‘युरो’ निधी

--

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला युरोपियन युनियनचा ‘मर्ज‘ (एमईआरजीई) प्रकल्प मंजूर करण्यात आला. दक्षिण आशियातील उच्चशिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतातील दोन विद्यापीठांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली, अशी माहिती ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या संचालक डॉ. वंदना हिवराळे यांनी दिली.

‘युरोपियन युनियन‘च्या वतीने आशियातील विविध विद्यापीठांसाठी प्रकल्पांतर्गत निधी देण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आजपर्यंत इरासमस मुंडस, इकासा, युनाटेल आदी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, तसेच पोर्तुगाल, स्पेन, तुर्कस्थान आदी देशांसमवेत ‘एक्स्चेंज प्रोग्राम’अंतर्गत संशोधक, प्राध्यापकांना पाठविण्यात आले आहे.

‘मर्ज’ प्रकल्पासाठी भारतातून दोन विद्यापीठांची निवड केली. यामध्ये अण्णा विद्यापीठाचा (चेन्नई)देखील समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाला आगामी तीन वर्षांसाठी ७५ हजार युरोचा निधी प्राप्त झाला आहे. इकासाअंतर्गत ‘मर्ज’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

इटली, स्पेन व रुमानिया या देशांतील जिनोआ विद्यापीठ, अ‍ॅगोरा इन्स्टिट्यूट व युनिव्हर्सिटी लुसिन बागा दिन सिबू या संस्थांचा या प्रकल्पात समावेश आहे. भारतासह आशियातील नेपाळ व आफगाणिस्तान या तीन देशांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उच्चशिक्षण संस्था कुशल मनुष्यबळ व तरुणांना तांत्रिक ज्ञान पुरविण्याचे काम करीत असतात.

देशात आजघडीला आशिया, आफ्रिका खंडातील अविकसित व विकसनशील देशातील विद्यार्थी युरोप व अमेरिका खंडातील विकसित देशातील विद्यार्थी भारतासारख्या देशात शिक्षणासाठी यावेत, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण व्हावे, या हेतूने हा निधी देण्यात आला आहे. याअंतर्गत १८ हजार युरो यंत्रसामग्रीसाठी मिळणार आहेत, तर प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनारसारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे डॉ. हिवराळे म्हणाल्या.

--

संशोधनाला गती देणार : कुलगुरू

--

‘इन्क्युब्युशन सेंटर’च्या माध्यमातून संशोधन व नवोन्मेष याला प्राध्यान्य देत आहे. ‘कोविड-१९’ नंतरचे जीवन ‘न्यू नॉर्मल लाईफ’ म्हणून ओळखले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. युरोपियन युनियनने ‘मर्ज’ प्रकल्पासाठी निवड केली ही आनंदाची बाब आहे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.