शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ...

औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत उघडी राहत आहेत. नजीकच्या काळात ही वेळ वाढू शकते. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर खाणे या दिवसांत टाळायलाच हवे.

पावसाळ्यात हे खायला हवे....

* ज्वारी अधिक उडिदाची भाकर पचायला सोपी असते, ती खावी.

*तांदूळ- तळणीची भाकरी खावी.

*रात्रीचे जेवण झोपण्याच्या अर्धा तास आधी करावे.

*पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी गवती चहा, अद्रक, तुळस व ओव्याची पाने खावीत.

*पाणी गरमच प्यावे.

*बिया असलेल्या भाज्या खाव्यात. भेंडी, दूधी भोपळा, कच्चे टोमॅटो, फ्लॉवर, ढेमसे अशा भाज्या खाव्यात.

*उपवास करणाऱ्यांनी शाबुदाणा पचायला जड असल्याने राजगिऱ्याचे थालीपीठ वगैरे असे पदार्थ खावेत.

*जेवण झाल्यानंतर पेरू, पपई खावेत. त्याचा जास्त फायदा होतो.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे...

*मांसाहार टाळावा.

*फास्ट फूड, तळलेले पदार्थ, इडली, ढोकळा असे पचनसंस्थेत ताण येतील असे पदार्थ खाऊ नयेत.

* गॅसेस होऊ नयेत यासाठी चवळी, वाटाणे खाऊ नयेत.

* उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळावे.

........................

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणेच होय. त्यामुळे रस्त्यावरचे अन्न टाळावेच. तळलेल्या पदार्थांमधून पोट बिघडण्याची अनेक उदाहरणे आहेत. या पदार्थांवर माश्यांचा सर्रास वावर असतो. असे पदार्थ खाल्ल्याने रोगराई वाढल्याशिवाय राहणार नाही.

..................

सावधान, पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते...

पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते. पचनसंस्थेशी निगडित आजार बळावतात. उदा. - जुलाब होणे, कावीळ होणे, कॉलरा होणे. हे आजार टाळण्यासाठी आहारावर‌ नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी उघड्यावरचे अन्नघटक खाणे टाळावे. पालेभाज्या टाळाव्यात. त्यांचा सूप घेणे चांगले. पांढऱ्या रक्तपेशीवर परिणाम होऊ नये म्हणून, व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी उघड्यावरचे अन्न घटक टाळलेच पाहिजेत.

- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ, औरंगाबाद

.....‌..........