शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ...

औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत उघडी राहत आहेत. नजीकच्या काळात ही वेळ वाढू शकते. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर खाणे या दिवसांत टाळायलाच हवे.

पावसाळ्यात हे खायला हवे....

* ज्वारी अधिक उडिदाची भाकर पचायला सोपी असते, ती खावी.

*तांदूळ- तळणीची भाकरी खावी.

*रात्रीचे जेवण झोपण्याच्या अर्धा तास आधी करावे.

*पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी गवती चहा, अद्रक, तुळस व ओव्याची पाने खावीत.

*पाणी गरमच प्यावे.

*बिया असलेल्या भाज्या खाव्यात. भेंडी, दूधी भोपळा, कच्चे टोमॅटो, फ्लॉवर, ढेमसे अशा भाज्या खाव्यात.

*उपवास करणाऱ्यांनी शाबुदाणा पचायला जड असल्याने राजगिऱ्याचे थालीपीठ वगैरे असे पदार्थ खावेत.

*जेवण झाल्यानंतर पेरू, पपई खावेत. त्याचा जास्त फायदा होतो.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे...

*मांसाहार टाळावा.

*फास्ट फूड, तळलेले पदार्थ, इडली, ढोकळा असे पचनसंस्थेत ताण येतील असे पदार्थ खाऊ नयेत.

* गॅसेस होऊ नयेत यासाठी चवळी, वाटाणे खाऊ नयेत.

* उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळावे.

........................

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणेच होय. त्यामुळे रस्त्यावरचे अन्न टाळावेच. तळलेल्या पदार्थांमधून पोट बिघडण्याची अनेक उदाहरणे आहेत. या पदार्थांवर माश्यांचा सर्रास वावर असतो. असे पदार्थ खाल्ल्याने रोगराई वाढल्याशिवाय राहणार नाही.

..................

सावधान, पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते...

पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते. पचनसंस्थेशी निगडित आजार बळावतात. उदा. - जुलाब होणे, कावीळ होणे, कॉलरा होणे. हे आजार टाळण्यासाठी आहारावर‌ नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी उघड्यावरचे अन्नघटक खाणे टाळावे. पालेभाज्या टाळाव्यात. त्यांचा सूप घेणे चांगले. पांढऱ्या रक्तपेशीवर परिणाम होऊ नये म्हणून, व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी उघड्यावरचे अन्न घटक टाळलेच पाहिजेत.

- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ, औरंगाबाद

.....‌..........