केदारखेडा: विकास कामांत कोणताही खोडा आणू नका, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. केदराखेडा येथील पूर्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़ संतोष सांबरे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मळेकर, शिवाजी थोटे, कैलास पुंगळे, कमालाकर साबळे, माधवराव हिवाळे, मुकेश पांडे, रामेश्वर पडोळ आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना दानवे म्हणाले, सिंचनाचा विकास साधत असताना गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नद्या जोडण्याचे मोठे काम केलेले आहे़ याबरोबरच पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून गावांना पक्के रस्ते केले़ शिवाय धरण प्रकल्प उभारुन शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला़ परंतु, आम्ही केलेल्या विकास कामावर गप्पा मारण्याचा सपाटा आघाडी सरकारचे लोकप्रतिनिधी लावत आहेत. विकास कामे करु नका, मात्र आम्ही केलेल्या विकास कामात त्यांनी किमान खोडा घालू नये, असे स्पष्ट मत दानवे यांनी व्यक्त केले. शेतकरी सधन व्हावा हीच आशा उरी बाळगून गिरजा-पूर्णा नदीवर आज दहाव्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. या पैकी नऊ कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपयोगात येत आहे़ या माध्यामातून गिरजा -पूर्णा नदीवर ५० किलोमीटरपर्यंत पाणीसाठा होत आहे. केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मी व आ़ सांबरे यांनी अहोरात्र प्रयत्न करुन मंजूर केला आहे. या बंधाऱ्याचे काम कोणीही रोखू शकत नाही ़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेशराव मुरकूटे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा़ गजानन तांबडे यांनी मानले़ या प्रसंगी मधुकरराव तांबडे, रमेश पांडे, मुकेश पांडे, सरपंच गोविंदराव बकाल, अंकुश जाधव, विठ्ठल पेरे, विलास मुरकूटे, नानासाहेब हिवाळे, कृष्णा ठोंबरे, पप्पू ठोंबरे, रामलाल चव्हाण, नानासाहेब वानखेडे, रुस्तुम सहाणे, दादाराव वाल्डे, बबनराव ठोंबरे, संजय खरात, रमेश पवार, बालासाहेब करतारे यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
विकासात खोडा नको - दानवे
By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST