शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

विकास आराखडा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद न मागण्याचा

By admin | Updated: October 17, 2016 21:42 IST

औरंगाबाद शहराच्या विकास आराखड्यासंदर्भातील विशेष परवानगी याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मनपा आयुक्तांचे शपथपत्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. १७  - औरंगाबाद शहराच्या विकास आराखड्यासंदर्भातील विशेष परवानगी याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मनपा आयुक्तांचे शपथपत्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यात आयुक्तांनी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत आहेत, असे नमूद करुन त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद न मागण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच सदर विशेष परवानगी याचिकेत त्यांना याचिकाकर्ता म्हणुन सामील करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्यास तो फेटाळून लावावा, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकुर आणि न्या. आदर्शकुमार गोयल यांनी मनपा आयुक्तांचे शपथपत्र रेकॉर्डवर ठेवण्याचे आदेश दिले. तसेच सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर २०१६ रोजी ठेवली आहे.

शहर विकास आराखड्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ४ आॅक्टोबर रोजीच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने विशेष परवानगी याचिका मनपा आयुक्तांमार्फत सादर करण्यासाठी वेळ दिला होता. आजच्या सुनावणीच्या वेळी महापौरांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रम्हण्यम, ज्येष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण आणि ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल जैन यांनी बाजू मांडली. त्यांनी मनपा आयुक्तांचे ४ आॅक्टोबर २०१६ चे पत्र न्यायालयात वाचून दाखविले. त्या पत्रात मनपा आयुक्तांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, सर्वसाधारण सभेने तयार केलेला विकास आराखडा त्यांना मान्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयास कळवावे. सदर पत्र सुनावणीनंतर मिळाल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच सर्वसाधारण सभेच्या विकास आराखड्याशी मनपा आयुक्त असहमत कसे असु शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मनपा आयुक्त सहकार्य करीत नसल्याने सदर प्रकरणात महापौरांनी शासनाकडे दाद मागीतल्याचे त्यांनी न्यायालयास सांगीतले.

महापौरांच्यावतीने युक्तीवाद सुरु असतानाच अ‍ॅड. अनिरुद्ध माई यांनी हजर होवून मनपा आयुक्तांचे शपथपत्रच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सदर शपथपत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून महापौरांच्या विशेष परवानगी याचिकेचेही अवलोकन केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी ते सहमत असल्यामुळे त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच शपथपत्रात वरीलप्रमाणे इतर बाबी नमूद केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात गोविंद नवपुते व इतरांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ बसवा पाटील, नागमोहन दास व अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, नकुल मोहता यांनी काम पाहिले.