शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

जायकवाडीचे पाणी रोखणाऱ्या किकवी धरणाचे टेंडर काढू नका

By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही,

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही, या आपल्याच धोरणाची पायमल्ली करणाऱ्या राज्य सरकारला औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या किकवी धरणासंबंधी कोणतीही निविदा काढू नये, असे अंतरिम आदेश न्या. आर. एम. बोर्डे, न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने दिले.राज्य शासनाने २००४ साली जाहीर केलेल्या धोरणामध्ये जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. या आपल्याच धोरणाची पायमल्ली करीत २०१६ साली नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने किकवी धरणाला परवानगी दिली. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात धरणे बांधण्यात आल्याने जायकवाडी धरण वेळेत भरत नाही. निधीअभावी ३० वर्षांपासून नांदूर -मधमेश्वर प्रकल्प रखडत ठेवून नाशिककरांसाठी हे धरण बांधले जात आहे. हे दोन्ही मुद्दे घेऊन विकास नामदेव लोळगे आणि बन्सीलाल यादव यांनी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने २१ आॅगस्ट रोजी जलसंपदा विभागाच्या सचिवांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी शपथपत्र सादर केले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागून घेतली. तेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किकवी धरणाची निविदा काढू नका, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला.