शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जायकवाडीचे पाणी रोखणाऱ्या किकवी धरणाचे टेंडर काढू नका

By admin | Updated: September 12, 2014 00:30 IST

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही,

औरंगाबाद : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यास मान्यता देण्यात येणार नाही, या आपल्याच धोरणाची पायमल्ली करणाऱ्या राज्य सरकारला औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या किकवी धरणासंबंधी कोणतीही निविदा काढू नये, असे अंतरिम आदेश न्या. आर. एम. बोर्डे, न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने दिले.राज्य शासनाने २००४ साली जाहीर केलेल्या धोरणामध्ये जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात नव्याने एकही धरण बांधण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. या आपल्याच धोरणाची पायमल्ली करीत २०१६ साली नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने किकवी धरणाला परवानगी दिली. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात धरणे बांधण्यात आल्याने जायकवाडी धरण वेळेत भरत नाही. निधीअभावी ३० वर्षांपासून नांदूर -मधमेश्वर प्रकल्प रखडत ठेवून नाशिककरांसाठी हे धरण बांधले जात आहे. हे दोन्ही मुद्दे घेऊन विकास नामदेव लोळगे आणि बन्सीलाल यादव यांनी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने २१ आॅगस्ट रोजी जलसंपदा विभागाच्या सचिवांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी शपथपत्र सादर केले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी मुदत मागून घेतली. तेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किकवी धरणाची निविदा काढू नका, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला.