शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा...

By admin | Updated: February 8, 2016 00:15 IST

उस्मानाबाद : अंधाराच्या वारसांनो एक ध्यानामध्ये ठेवा, असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा ।।

उस्मानाबाद : अंधाराच्या वारसांनो एक ध्यानामध्ये ठेवा,असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा ।।तुम्ही मारलात गांधी, पानसरे, दाभोळकरपिस्तुलाच्या धाकावर त्यांनी शिवार घेरलं ।।येथील बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीमधील मुनेरबी शेख साहित्य मंचावर विविध विषय, प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या कवितांनी रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सलग दोन तास चाललेल्या या कविसंमेलनाला उपस्थित असलेल्या रसिकांनीही मोठी दाद दिली. शनिवारी रात्री आठ वाजता औरंगाबाद येथील कवयित्री रसिका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित महिलांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांच्या काळजाचा ताबा मिळविला. उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री वाघमारे यांनी सादर केलेल्या कवितेमुळे उभे सभागृह गंभीर बनले. भेगाळली भुई खोल, अन् अंधारून आलं ,पिस्तुलाच्या धाकावर, त्यांनी शिवार घेरलं ,,या कवितेच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवर सूचक भाष्य केले. लातूर येथील कवयित्री शैलजा कारंडे यांनी सादर केलेल्या कवितेला स्त्रीयांनी मोठा प्रतिसाद दिला. साखर नको की, तूप नको,दूध नको की, साय ।क्षणभरासाठी का होईना,हो ना माझी माय ।।अशा ओळीत कारंडे यांनी ममतेसाठी आसूसलेल्या भावूक मनाची व्यथा सर्वांसमोर मांडली. नयन राजमाने यांनी सादर केलेल्या ‘निर्भिड अंधार’ या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनीता कुलकर्णी-पाटील यांच्या गझलनेही उपस्थितांची वाहवा मिळविली.वेदना माज्या उराचे दार ठोठावून येते, रोज एखाद्या सुखालासंगती घेवून येते...अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भाव प्रकट केला. माजलगाव येथून आलेल्या कवयित्री गौरी देशमुख यांनी शनिशिंगणापूर प्रकरणामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या विषयाला आपल्या कवितेतून वाट करून दिली. सांगा शनिदेवा आमचं काय चुकलं,स्त्रीयांच्या दर्शनाने मंदिर तुमचं बाटलं...अशा परखड शब्दात त्यांनी या कवितेच्या माध्यमातून परंपरेच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाचा बुरखा फाडण्याचे काम केले. यांच्यासह अनेक कवयित्रींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून रसिकांना विचार करावयास भाग पाडले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रेखा ढगे यांनी केले. कविसंमेलनाची सुरूवात संमेलनाध्यक्ष डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या काव्यवाचनाने झाली. यावेळी शहरासह परिसरातील रसिक-श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)