शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

डीएमआयसीअंतर्गत स्वतंत्र आयटी पार्क हवे

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

नजीर शेख, औरंगाबाद औरंगाबाद शहराच्या परिसरात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक वसाहतीमध्ये आयटी (माहिती तंत्रज्ञान) पार्कसाठी जागा राखीव ठेवायला हवी, असे मत या प्रताप धोपटे यांनी व्यक्त केले.

नजीर शेख,  औरंगाबादऔद्योगिक क्षेत्रात भरारी घेत असलेल्या औरंगाबाद शहराच्या परिसरात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक वसाहतीमध्ये आयटी (माहिती तंत्रज्ञान) पार्कसाठी जागा राखीव ठेवायला हवी, असे मत या क्षेत्रातील जाणकार प्रताप धोपटे यांनी व्यक्त केले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात प्रताप धोपटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी देशातील आणि राज्यातील आयटी इंडस्ट्रीजचा आढावा घेतला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती होण्याची क्षमता औरंगाबादमध्ये आहे. इथे आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि जागा मिळू शकते. विविध महाविद्यालये आहेत. डीएमआयसीमुळे वसाहती वाढून शिक्षणाचे क्षेत्र विस्तारणार आहे. यामुळे आयटीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. सद्य:स्थितीचा विचार केल्यास आपल्याकडे आयटीच्या चार-पाच कंपन्या आहेत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आहे. काही कंपन्या तेथे आपापल्या परीने वाढीचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोठ्या कंपन्या आल्याशिवाय औरंगाबादमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार होणार नाही. अर्थात, हा विस्तार आपल्याला करावयाचा असेल तर जाणीवपूर्वक काही प्रयत्न करण्याची गरज आहे. डीएमआयसीअंतर्गत नव्याने शेंद्रा, करमाड, बिडकीन भागात औद्योगिक वसाहती निर्माण होणार आहेत. या परिसरात आयटी पार्कसाठी जागा राखीव असावी, जेणेकरून ती जागा आयटी क्षेत्रातील कंपन्यांनाच देता येईल. सध्या आपल्या राज्याचा विचार करता मुंबई, पुणे आणि काही प्रमाणात नागपूर याठिकाणी आयटी क्षेत्र विकसित होत आहे. एकट्या टाटा कन्सल्टन्सीचा विचार केला तर ही कंपनी भुवनेश्वर, थिरुवनंतपुरम, कोची यासारख्या शहरात गेली. आपल्या राज्यात नागपूर येथेही कंपनीचे कार्यालय आहे. आपण तर मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहोत. आपल्याकडे पुणे- औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण आहे. एअर कनेक्टिव्हिटी आहे. याचा फायदा मिळायला हवा. आयटी पार्कमध्ये कंपन्यांना स्वस्तात जागा मिळायला हवी. याठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना स्थान मिळाले पाहिजे. अन्यथा माहिती तंत्रज्ञानाशी साधर्म्य असलेली नावे धारण करून काही कंपन्या कमी दरातील जागा मिळवितात, असा अनुभव आहे. या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच ते सहा नामांकित कंपन्या येथे आल्यास या भागात आयटीचा विस्तार होईल. त्यासाठी स्थानिक औद्योगिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. अशा कंपन्यांना काही प्रमाणात सवलती दिल्या गेल्या पाहिजेत.डीएमआयसीमुळे या शहराचे नाव देशभरात चर्चिले जात आहे. त्याचा फायदा आपल्याला व्हायला हवा. येथे आयटी पार्क विकसित झाल्यास या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या स्थानिक तरुणांचे स्थलांतर होणार नाही. शिवाय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रही विकसित होईल. यापुढे जाऊन सांगायचे झाल्यास येथे आयटी सेझ विकसित व्हायला पाहिजे. ते झाले तर उत्तमच; पण सद्य:स्थितीत आपण आयटी पार्क विकसित व्हावे, असा विचार करू या. आपल्याकडे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे आॅटो क्लस्टर डेव्हलप झाले, त्याच धर्तीवर क्लस्टर पद्धतीनेही माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्तार आणि विकास व्हायला पाहिजे, असे वाटते. मात्र, हे करण्यासाठी नामांकित कंपन्या जाणीवपूर्वक आणाव्या लागतील.