शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

डीएमआयसी आले; परंतु औरंगाबाद शहराचा ‘चेहरा’ बदलणार काय?

By admin | Updated: August 10, 2014 02:04 IST

डीएमआयसी- औरंगाबादचा बदलता चेहरा’ या संवादात्मक कार्यक्रमात एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी व डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी यांनी उत्तरे दिली.

औरंगाबाद : डीएमआयसी प्रकल्पाची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी व त्यांच्या मनात या प्रकल्पाविषयी असलेल्या शंकांचे समाधान व्हावे, या उद्देशाने आयोजित ‘डीएमआयसी- औरंगाबादचा बदलता चेहरा’ या संवादात्मक कार्यक्रमात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी व डीएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी यांनी समाधानकारक उत्तरे दिली. ‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ असा संवादाचा विषय असल्याने एका प्रश्नकर्त्याने शहरातील रस्ते व इतर समस्यांबद्दल ‘औरंगाबादचा चेहरा बदलणार काय? असा खोचक प्रश्न विचारला. या प्रश्नावर मी बोललो तर ते राजकीय उत्तर ठरेल, असे सांगून शालेय शिक्षणमंत्र्यांनी एका उद्योजकाचे वेळेचे प्लॅनिंग खराब रस्त्यामुळे कसे कोलमडले व त्यांचे विमान कसे हुकले हा किस्सा सांगितला.सीएमआयचे अध्यक्ष मुनीष शर्मा म्हणाले, डीएमआयसीमुळे मोठे उद्योग औरंगाबादेत येत असतील, त्यासाठी औरंगाबाद शहराचे रूपही बदलायला हवे. त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी आमची सातत्याने मागणी आहे. प्रश्न - शेतकऱ्यांना १५ टक्के जमीन वाटप कधी होणार?गगराणी - शेंद्रा- बिडकीन ही शहरे ‘अर्ली बर्ड’ आहेत. प्रक्रिया वेगात सुरू आहे. मास्टर प्लॅन तयार आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या की, डीएमआयसी व एमआयडीसीची संयुक्त कंपनी स्थापन करून त्यामार्फत शेतकऱ्यांना जमिनी परत केल्या जातील. प्रश्न - तिसऱ्या टप्प्यांतील भूसंपादन केव्हा होणार?गगराणी - पहिल्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील संपादन प्रगतिपथावर आहे. हे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्याशिवाय तिसऱ्याचा विचार केला जाणार नाही. प्रश्न - अ‍ॅग्रो प्रोसेसिंगसाठी काही पायाभूत सुविधा आहेत काय?गगराणी - या प्रकल्पात कोणकोणते उद्योग येऊ शकतात याचा विचार झाला आहे. परंतु कुठल्याही उद्योगासाठी स्वतंत्र क्लस्टर निर्माण केले जाणार नाहीत. अशा उद्योगांनी एकत्रित मागणी केली तर तशा सुविधा निर्माण करून दिल्या जातील. प्रश्न - अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भूखंड सवलतीत देणार काय?गगराणी - तसे सांगता येणार नाही. परंतु शेंद्य्राच्या आसपासच्या परिसराचा आजचा दर पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. एमआयडीसीत ५२० रुपये दराने भूखंड मिळतो. यापेक्षा आणखी काय सवलत हवी. इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर कोठे होणार, शेंद्रा ते दिघी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग टाकणार काय, आदी प्रश्नही उपस्थित झाले.