शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दिवाळीत होणार ७०० कोटींची उलाढाल

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : दसरा व दिवाळी हे महासण पुढील महिन्यातच येत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाचे सावट हटले आहे.

औरंगाबाद : दसरा व दिवाळी हे महासण पुढील महिन्यातच येत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाचे सावट हटले आहे. तसेच पहिल्या पंधरवड्यात दसरा व दुसऱ्या पंधरवड्याच्या अखेरीस दिवाळी येत असल्याने आॅक्टोबरचा पगार व दिवाळीचा बोनस तसेच नोव्हेंबरचा आगाऊ पगार असा दोन महिन्यांचा पगार हाती येणार असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. या सकारात्मक वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी व्यापारीवर्गाची लगीनघाई सुरूझाली आहे. या महासणात बाजारपेठेत ७०० कोटींची उलाढाल होणार असल्याचा होरा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (पान ५ वर)पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, गणेशोत्सवात इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील उलाढालीत मागील वर्षीपेक्षा २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. येत्या दसरा-दिवाळीदरम्यान २५ ते ३० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. ४महासणात एलईडी टीव्हीची सर्वाधिक विक्री होत असते तसेच मागील वर्षीपेक्षा १० ते १५ टक्के किमती घटल्याने टीव्हीची विक्री आणखी वाढेल. याशिवाय फ्रीज, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशीन आदींनाही चांगली मागणी राहील. कंपन्यांनी आपल्या विशेष योजना जाहीर केल्या आहेत. किराणा बाजारात ४० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असल्याचे सांगितले जात आहे. टिंकू खटोड या व्यापाऱ्याने सांगितले की, दसरा-दिवाळीत खाद्यतेल व वनस्पती तुपाची मोठी विक्री होते. त्यात वनस्पती तुपाचा तुटवडा मागील वर्षी निर्माण झाला होता. ऐन वेळेवर गोंधळ नको म्हणून किराणा व्यापाऱ्यांनी कंपन्यांकडे वनस्पती तुपाची आगाऊ नोंदणी करणे सुरू केले आहे. कमिशन एजंट प्रकाश जैन म्हणाले की, दिवाळीनिमित्त भडंग मुरमुरे व पोह्याची आगाऊ नोंदणी होत असून १ आॅक्टोबरपासून माल येण्यास सुरुवात होईल.कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात नवनवीन फॅशनच्या कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात गेले आहेत. अजय तलरेजा यांनी सांगितले की, साडीसाठी कोलकाता, बनारस, बंगळुरू, मदुराई, सुरत. शर्टिंग-सूटिंग्साठी मुंबई, भिलवाडा, पंजाबी ड्रेससाठी अहमदाबाद, सुरत तर लहान मुलांचे कपडे मुंबई व कोलकाता येथून येणार आहेत. आॅर्डर बुक करणे सुरू झाले असून १ आॅक्टोबरपासून नवीन स्टॉक बाजारात येण्यास सुरुवात होईल. औरंगाबाद जिल्हा मोबाईल विक्रेता असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी सांगितले की, मोबाईल उत्पादक प्रमुख कंपन्यांनी प्रत्येक विक्रेत्याला ३० टक्के वाढीव उद्दिष्ट दिले आहे. तसेच १५ हजारांवरील मोबाईल खरेदीवर अर्थसाहाय्य उपलब्ध झाले आहे. पुढील महिन्यात ४० कोटींचे मोबाईल विक्री होतील, असा कंपन्यांनी अंदाज व्यक्त केला.