शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत होणार ७०० कोटींची उलाढाल

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : दसरा व दिवाळी हे महासण पुढील महिन्यातच येत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाचे सावट हटले आहे.

औरंगाबाद : दसरा व दिवाळी हे महासण पुढील महिन्यातच येत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाचे सावट हटले आहे. तसेच पहिल्या पंधरवड्यात दसरा व दुसऱ्या पंधरवड्याच्या अखेरीस दिवाळी येत असल्याने आॅक्टोबरचा पगार व दिवाळीचा बोनस तसेच नोव्हेंबरचा आगाऊ पगार असा दोन महिन्यांचा पगार हाती येणार असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. या सकारात्मक वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी व्यापारीवर्गाची लगीनघाई सुरूझाली आहे. या महासणात बाजारपेठेत ७०० कोटींची उलाढाल होणार असल्याचा होरा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (पान ५ वर)पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, गणेशोत्सवात इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील उलाढालीत मागील वर्षीपेक्षा २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. येत्या दसरा-दिवाळीदरम्यान २५ ते ३० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. ४महासणात एलईडी टीव्हीची सर्वाधिक विक्री होत असते तसेच मागील वर्षीपेक्षा १० ते १५ टक्के किमती घटल्याने टीव्हीची विक्री आणखी वाढेल. याशिवाय फ्रीज, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशीन आदींनाही चांगली मागणी राहील. कंपन्यांनी आपल्या विशेष योजना जाहीर केल्या आहेत. किराणा बाजारात ४० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असल्याचे सांगितले जात आहे. टिंकू खटोड या व्यापाऱ्याने सांगितले की, दसरा-दिवाळीत खाद्यतेल व वनस्पती तुपाची मोठी विक्री होते. त्यात वनस्पती तुपाचा तुटवडा मागील वर्षी निर्माण झाला होता. ऐन वेळेवर गोंधळ नको म्हणून किराणा व्यापाऱ्यांनी कंपन्यांकडे वनस्पती तुपाची आगाऊ नोंदणी करणे सुरू केले आहे. कमिशन एजंट प्रकाश जैन म्हणाले की, दिवाळीनिमित्त भडंग मुरमुरे व पोह्याची आगाऊ नोंदणी होत असून १ आॅक्टोबरपासून माल येण्यास सुरुवात होईल.कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात नवनवीन फॅशनच्या कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात गेले आहेत. अजय तलरेजा यांनी सांगितले की, साडीसाठी कोलकाता, बनारस, बंगळुरू, मदुराई, सुरत. शर्टिंग-सूटिंग्साठी मुंबई, भिलवाडा, पंजाबी ड्रेससाठी अहमदाबाद, सुरत तर लहान मुलांचे कपडे मुंबई व कोलकाता येथून येणार आहेत. आॅर्डर बुक करणे सुरू झाले असून १ आॅक्टोबरपासून नवीन स्टॉक बाजारात येण्यास सुरुवात होईल. औरंगाबाद जिल्हा मोबाईल विक्रेता असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी सांगितले की, मोबाईल उत्पादक प्रमुख कंपन्यांनी प्रत्येक विक्रेत्याला ३० टक्के वाढीव उद्दिष्ट दिले आहे. तसेच १५ हजारांवरील मोबाईल खरेदीवर अर्थसाहाय्य उपलब्ध झाले आहे. पुढील महिन्यात ४० कोटींचे मोबाईल विक्री होतील, असा कंपन्यांनी अंदाज व्यक्त केला.