शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

जिल्हा टँकरमुक्त

By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड मागील आठ दिवसांत जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयातील २६० टँकर, १६३ विहिरी तर ३४३ अधिग्रहीत बोअर प्रशासनाने बंद केले आहेत़ यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी

व्यंकटेश वैष्णव , बीडमागील आठ दिवसांत जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयातील २६० टँकर, १६३ विहिरी तर ३४३ अधिग्रहीत बोअर प्रशासनाने बंद केले आहेत़ यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसाला दहा लाख ३२ हजार ५०० रूपयांचा शासनाचा खर्च बंद झाला असल्याचे पाणी पुरवठा विभागातील सुत्रांनी सांगितले़एक एप्रिल पासून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता़ जून महिन्यापासून टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली़ आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात टँकरची संख्या २६० वर गेली होती़ यामध्ये २११ गावे तर ३११ वाड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती़ यात बीड, गेवराई, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी, केज, धारूर आदी तालुक्यांचा समावेश होता़ एप्रिल महिन्यापासून शासन टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत होते़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात२१़९३ मि़ मी़ पाऊस झाल्यामुळे टंचाई काळात बंद पडलेले पाण्याचे उदभव सुरू झाले आहेत. वाड्या, वस्त्यावरील हातपंप सुरू होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ मागील पाच महिन्यांत पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. एका टँकरला दिवसाकाठी तीन हजार रूपयाच्या जवळपास भाडे द्यावे लागायचे तर अधिग्रहीत केलेल्या बोअर व विहीरींना दिवसाकाठी पाचशे रूपये भाडे द्यावे लागत होते. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सांगितले की, जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची समस्या संपल्याने टँकर बंद केलेले आहेत.दहा दिवसांच्या पावसामुळे नदी, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न जवळपास मिटला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी पुढील तयारी करतील यात शंका नाही. मात्र सध्याचा पाऊस आणखी झाला तर ओला दुष्काळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.