शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

निधीच्या विनियोगासाठी जि.प.त समन्वय समिती

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद :विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला सरकारकडून प्राप्त विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मुख्य वित्त व लेखाधिकारी या समितीच्या अध्यक्षपदी राहणार असून, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव राहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, बांधकाम आदी विभागांची सर्व बांधकामे व दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाला करावी लागतात; परंतु अनेकदा समन्वयाअभावी काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते व तो निधी अखर्चित राहतो. निधी अन्य एखाद्या विभागाचा असतो व तो बांधकाम विभागाला खर्च करावा लागतो; परंतु सदर कामाचे नियोजन व प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे काम त्या-त्या विभागाचे असते. त्यात दोन्ही विभागांत समन्वय नसला, तर कामांना विलंब होतो व पर्यायाने निधी लॅप्स होण्याचे प्रमाण वाढते. यापुढे जिल्हा परिषदेला मिळणारी पै अन् पै निर्धारित वेळेत खर्च करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण व सदस्य सचिव म्हणून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची निवड केली आहे. शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. एम.एल. साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार हे समितीचे सदस्य आहेत. या समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या सोमवारी कॅफोच्या दालनात होईल. समितीची पहिली बैठक दि.२२ डिसेंबर रोजी होणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.