शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणूक : बिनविरोध होणार की चुरस वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. ती कशी ...

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सुरेशदादा पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक. ती कशी होते याबद्दल जिल्ह्यात प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे.

सर्व पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यात सुरेशदादांचा जणू हातखंडाच राहिला. ही प्रथा त्यांचे चिरंजीव व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना चालू ठेवण्यात कितपत यश मिळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात हे मोठे आव्हान आहे. सुरेशदादांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे वय आणि बँकेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव याबद्दल एक आदरभाव होता. काटकसरीचे नियोजन करून बँकेला नफ्यात आणण्याची किमया त्यांना साधली होती. ''पारदर्शी'' अशी त्यांची प्रतिमा बनली होती.

या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडणुकीत काय चित्र निर्माण होते, याबद्दल उत्सुकता आहे. सुरेशदादा पाटील अनेक जागा बिनविरोध निवडून आणण्यात यशस्वी होत असत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भाजप, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी असे पक्ष त्यांच्या पाठीशी शक्ती एकवटत असत.

एकूण २० संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे पाटील, महसूल खात्यासह विविध खात्यांचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्यासारखे दिग्गज बँकेचे विद्यमान संचालक आहेत. या निवडणुकीत या तिघांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

नितीन पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझे वडील सुरेशदादा यांच्या निधनानंतर संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्ष बनविले. वर्षभर मी धुरा सांभाळली व मुदत संपल्यानंतर तेव्हाच निवडणूकही होऊन गेली असती. परंतु, कोरोना महामारी सुरू झाली आणि सतत तीनवेळा मुदतवाढ मिळत गेली. या काळात अध्यक्ष म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे व बँक नफ्यात कशी राहील, हे पाहिले आहे. यावेळी बँकेला चांगला नफा झालेला बघावयास मिळेल.

मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील. प्राथमिक पातळीवर मी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय. हळूहळू चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.

विद्यमान संचालकांपैकी काही जणांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. उलट भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे दोन पॅनेल तरी दिसतील व निवडणूक चुरशीचीच होईल.