शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

पाणीपुरवठा योजनांच्या कामांवरून प्रशासनावर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला. उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागात पोहोचत असताना सदस्यांनी सुचविलेली एकही विंधन विहीर झाली ...

औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला. उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागात पोहोचत असताना सदस्यांनी सुचविलेली एकही विंधन विहीर झाली नाही. तात्पुरत्या पाणीपुरवठ्याच्या चार योजना सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात टंचाईची अत्यावश्यक कामे तांत्रिक अडसर दाखवून होत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाबद्दल सदस्यांत नाराजीचा सूर आहे.

टंचाईच्या सर्वेक्षणात कनिष्ठ भूवैज्ञानिक नसल्याचे कारण समोर करून पाणीपुरवठा विभाग वेळ मारून नेत आहे. जलव्यवस्थापन समितीत सूचना करूनही कामे होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती पावले उचलून टंचाईग्रस्त गावांत पाण्याची सुविधा निर्माण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी समाजमाध्यमातून केली. त्यावर टंचाईची परिस्थिती मान्य आहे. मात्र, दोन्ही बाजूने विचार व्हावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी मत व्यक्त केले.

याविषयी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे म्हणाले, वैजापूर ३, गंगापूर १, सिल्लोड १ अशा गावांत कनिष्ठ भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण करून टंचाईचे प्रपत्र ब भरून दिले. रमेश पवार यांनी सूचना केलेला औरंगाबाद तालुक्यातील गावांचा सर्वेक्षण अहवाल सोमवारी सादर होईल. त्यांनी पूर्वी सुचविलेल्या विंधन विहिरीसंदर्भात १५ दिवसांसाठी मिळालेल्या भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण करून फिजिबिलिटी नसल्याचे सांगितल्याने ती कामे होऊ शकली नाहीत. त्याचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, सर्वेक्षण सुरू आहे. जिल्ह्यात पैठणमध्ये हर्षा, नांदर, गंगापूर आणि सिल्लोडमध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा नळयोजनांची कमी खर्चाची कामे प्रस्तावित आहे. ती प्रगतीपथावर आहेत.

---

तीन भूवैज्ञानिक दोन दिवसांत मिळतील

कंत्राटी स्वरूपात तीन भूवैज्ञानिकांची निवड यादी तयार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर त्यांना नियुक्ती देण्यात येईल. मागणी असलेल्या टंचाई क्षेत्रात ते सर्वेक्षण करून प्रपत्र ब भरतील. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने टाचाईचे कामे सुरू होतील. जलजीवन मिशनच्या कामांनाही चालना मिळेल. त्यामुळे पुढील आठवड्याभरात तांत्रिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता अशोक घुगे यांनी व्यक्त केली.