शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वीस गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज केली खंडित

By admin | Updated: January 15, 2017 23:22 IST

जालना/वडीगोद्री :वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

जालना/वडीगोद्री : महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. शहर परिसरातील वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान वडीगोद्री परिसरातील वीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा पुरवठा खंडित केल्याने गावात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. वडीगोद्री परिसरात थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण राबवित आहे. याचा ‘झटका’ वीस गावांच्या पाणी योजनांनाही बसला आहे. वडीगोद्री परिसरातील वीज बिल थकीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचेही वीज तोडण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांना भर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या थकीत बिलाचा आकडा ३० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे गतवर्षीपासून वीज बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी दिवसभर वडीगोद्री परिसरातील २० गावांचा पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. रविवारी सुटीमुळे ही मोहीम बंद ठेवली असली तरी सोमवारपासून उर्वरित गावांत मोहीम तीव्र करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत काही प्रमाणात का होईना वीज बिलांचा भरणा करीत होती. मात्र, मागील वर्षीपासून अनेक ग्रामपंचयातींनी वीज बिल भरणाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण घटले आहे. यासोबतच थकबाकीत असलेले व्यावसाईक, औद्योगिक तसेच सरकारी कार्यालये घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरूध्दही ही मोहीम सुरू केली असून, ती मार्च अखेरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)