शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

शाळा-पालकांचे वाद जात आहेत विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : गेल्या २ दिवसांत २ शाळांतील पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अवाजवी शाळा शुल्क वसुली व ऑनलाइन शिक्षणाची लिंक ...

औरंगाबाद : गेल्या २ दिवसांत २ शाळांतील पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अवाजवी शाळा शुल्क वसुली व ऑनलाइन शिक्षणाची लिंक बंद केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांना बोलविण्यापर्यंत शाळा पालकांतील शुल्कासंबंधीचे वाद वाढत असताना, विभागीय शुल्क नियमन समितीचे कामकाज सुरू झाले नसल्याने तोडगा निघेल कसा, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे, तर शुल्क भरले नाही, तर शाळा व्यवस्थापन कसे चालवायचे, असा सवाल खासगी, इंग्रजी शाळांच्या संघटना करत आहे.

शाळा पालकांकडून अवाजवी फी आकारत आहे. मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण थांबविता येत नाही, तरी ऑनलाइन शिक्षणाच्या लिंक बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शुल्क विनिमय कायदा, नियम या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शाळा खोटे हिशेब दाखवून अनधिकृत फी आकारत आहे. शाळांच्या नफेखोरीवर राज्य शासनाचा अंकुश नसल्याने हे वाद निर्माण होत आहेत. महामारीच्या काळात पालकांच्या समस्या शाळा समजून घेतल्याने विसंवाद वाढतोय. याला काही शाळा अपवादही आहेत, असे पालक संघटनांचे म्हणणे आहे.

वीजबिल, शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, बॅंकाचे हप्ते यासह शाळा चालविण्यासाठी करण्यात येणारे विविध खर्च हे पालकांनी शाळा भरलेल्या शुल्कातूनच केले जातात. गेल्या वर्षीची अनेक पालकांनी फी भरली नाही. सवलत देऊनही फी भरली नाही, तर शाळा कशी चालले, असा सवाल मुख्याध्यापकांसह संस्था चालकांकडून केला जात आहे, तर पालक शाळा वाद विकोपाला जाऊन पोलिसांना बोलविण्यापर्यंत प्रसंग घडत आहे. हे रोखण्यासाठी शिक्षण विभाग कायद्यांआडची हतबलता दाखवत असल्याने हे वाद कसे मिटतील, याकडे पालकांसह शाळांचे लक्ष लागले आहे.

---

गेल्या चाैकशींत दोषी शाळांवर पुढे काय कारवाई झाली. हे कायम गुलदस्त्यात आहे. शिक्षण विभागाच्या आदेशांची अंमलबजावणी झाल्याची खात्री त्यांनी करायला हवी. आतापर्यंत विभागीय शुल्क नियमन समितीचे (डीएफआरसी) कामकाज सुरू नसल्याने शाळांचे तंटे सोडवायचे कुठे, असा प्रश्न असून, शाळेचे ऑडिट महालेखा परीक्षकांकडून करण्याची पॅरेंट्स ॲक्शन कमिटी अर्थात ‘पा’ संघटनेची प्रमुख मागणी आहे.

- उदय सोनोने, अध्यक्ष पॅरेंटस ॲक्शन कमिटी

---

शाळा व्यवस्थापनासाठी लागणारे वेगवेगळे खर्च, वेतन, कर हे खर्च निघण्याचे मार्ग शासनाने बंद केले. कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य शाळांची गळचेपी प्रयत्न सुरू आहे. गुणवत्तेचे शिक्षण मिळण्यासाठी पालकांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहीजे. काही तरी शाळा शुल्क भरले, तरच शाळा चालतील, नाहीतर गुणवत्तेच्या शिक्षणाची माळ तुटेल.

- एस.पी. जवळकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

--

जिल्ह्यातील शाळा - ४,५५५

जिल्हा परिषदेच्या शाळा - २,१३१

अनुदानित शाळा - ९६५

विनाअनुदानित शाळा -१,३३९

शासनाच्या शाळा - १३

महानगरपालिकेच्या शाळा - ८८

नगरपालिका, परिषद पंचायतच्या शाळा - १९