शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

शाळा-पालकांचे वाद जात आहेत विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST

औरंगाबाद : गेल्या २ दिवसांत २ शाळांतील पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अवाजवी शाळा शुल्क वसुली व ऑनलाइन शिक्षणाची लिंक ...

औरंगाबाद : गेल्या २ दिवसांत २ शाळांतील पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे अवाजवी शाळा शुल्क वसुली व ऑनलाइन शिक्षणाची लिंक बंद केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांना बोलविण्यापर्यंत शाळा पालकांतील शुल्कासंबंधीचे वाद वाढत असताना, विभागीय शुल्क नियमन समितीचे कामकाज सुरू झाले नसल्याने तोडगा निघेल कसा, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे, तर शुल्क भरले नाही, तर शाळा व्यवस्थापन कसे चालवायचे, असा सवाल खासगी, इंग्रजी शाळांच्या संघटना करत आहे.

शाळा पालकांकडून अवाजवी फी आकारत आहे. मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण थांबविता येत नाही, तरी ऑनलाइन शिक्षणाच्या लिंक बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शुल्क विनिमय कायदा, नियम या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शाळा खोटे हिशेब दाखवून अनधिकृत फी आकारत आहे. शाळांच्या नफेखोरीवर राज्य शासनाचा अंकुश नसल्याने हे वाद निर्माण होत आहेत. महामारीच्या काळात पालकांच्या समस्या शाळा समजून घेतल्याने विसंवाद वाढतोय. याला काही शाळा अपवादही आहेत, असे पालक संघटनांचे म्हणणे आहे.

वीजबिल, शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, बॅंकाचे हप्ते यासह शाळा चालविण्यासाठी करण्यात येणारे विविध खर्च हे पालकांनी शाळा भरलेल्या शुल्कातूनच केले जातात. गेल्या वर्षीची अनेक पालकांनी फी भरली नाही. सवलत देऊनही फी भरली नाही, तर शाळा कशी चालले, असा सवाल मुख्याध्यापकांसह संस्था चालकांकडून केला जात आहे, तर पालक शाळा वाद विकोपाला जाऊन पोलिसांना बोलविण्यापर्यंत प्रसंग घडत आहे. हे रोखण्यासाठी शिक्षण विभाग कायद्यांआडची हतबलता दाखवत असल्याने हे वाद कसे मिटतील, याकडे पालकांसह शाळांचे लक्ष लागले आहे.

---

गेल्या चाैकशींत दोषी शाळांवर पुढे काय कारवाई झाली. हे कायम गुलदस्त्यात आहे. शिक्षण विभागाच्या आदेशांची अंमलबजावणी झाल्याची खात्री त्यांनी करायला हवी. आतापर्यंत विभागीय शुल्क नियमन समितीचे (डीएफआरसी) कामकाज सुरू नसल्याने शाळांचे तंटे सोडवायचे कुठे, असा प्रश्न असून, शाळेचे ऑडिट महालेखा परीक्षकांकडून करण्याची पॅरेंट्स ॲक्शन कमिटी अर्थात ‘पा’ संघटनेची प्रमुख मागणी आहे.

- उदय सोनोने, अध्यक्ष पॅरेंटस ॲक्शन कमिटी

---

शाळा व्यवस्थापनासाठी लागणारे वेगवेगळे खर्च, वेतन, कर हे खर्च निघण्याचे मार्ग शासनाने बंद केले. कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य शाळांची गळचेपी प्रयत्न सुरू आहे. गुणवत्तेचे शिक्षण मिळण्यासाठी पालकांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहीजे. काही तरी शाळा शुल्क भरले, तरच शाळा चालतील, नाहीतर गुणवत्तेच्या शिक्षणाची माळ तुटेल.

- एस.पी. जवळकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

--

जिल्ह्यातील शाळा - ४,५५५

जिल्हा परिषदेच्या शाळा - २,१३१

अनुदानित शाळा - ९६५

विनाअनुदानित शाळा -१,३३९

शासनाच्या शाळा - १३

महानगरपालिकेच्या शाळा - ८८

नगरपालिका, परिषद पंचायतच्या शाळा - १९