शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

वनपरिक्षेत्राचा वाद; वृक्षतोड जोमात

By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST

विलास भोसले , पाटोदा तालुक्यातील वनपरिक्षेत्राच्या जमिनीबाबत वन विभागातच वाद आहे. जमीन नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे.

विलास भोसले , पाटोदातालुक्यातील वनपरिक्षेत्राच्या जमिनीबाबत वन विभागातच वाद आहे. जमीन नेमकी कोणाची, असा प्रश्न आहे. वनविभागात अशी परिस्थिती असताना वनपरिक्षेत्रात मात्र जोमात वृक्षतोड सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटोदा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत २ हजार ७११ हेक्टर वन जमीन आहे. सौताडा येथील ८२ हेक्टर क्षेत्र बीट पुनर्रचनेच्या नावाखाली २००९ मध्ये आष्टी कार्यालयातील मातकुळी बीटला जोडले आहे. या जमिनीचा गट क्र. ३२६ व ३९२ आहे. येथे कागदोपत्री ८२ हेक्टर जमीन दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र ही जमीन ६२ हेक्टरच असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मग उर्वरित जमीन गेली कोठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. पाटोदा तालुक्यांतर्गत शिरूर तालुक्याचा कारभार चालतो. या तालुक्यातील ग. क्र. ५१ व ९६ हे झापेवाडी शिवारात आहेत. झापेवाडी हे क्षेत्र बीड, शिरूर व पाथर्डी राज्य महामार्गावर असल्याने यावर अनेकांचा डोळा आहे. येथील २०० हेक्टर वन जमीन क्षेत्रासंबंधीही वाद सुरू असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये हे क्षेत्र वन विभागाचे आहे. महसूल प्रशासनाने मात्र जमिनीची नोंद सातबाऱ्यावर मालकी हक्कात ‘महाराष्ट्र शासन वन विभाग’ अशी नोंद करणे आवश्यक असताना हे क्षेत्र ‘फॉरेस्ट’ अशी नोंद केलेली आहे. त्यामुळे मालकी हक्काच्या या नोंदीवरूनही संभ्रम निर्माण होत आहे. अशा परिस्थितीच राज्य शासनाने या जमिनीवर पाटोदा तहसील कार्यालयाची इमारती उभारली आहे. शिवाय क्रीडा संकुलासाठी १ हेक्टर जमिनीचे आरक्षण केले आहे. तर, काही भूखंड खाजगी लोकांना वितरित केले आहेत. उर्वरित काही जमिनीवर इतर शासकीय कार्यालये उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्या-त्या भूखंडावर आपले कार्यालय होणार? अशा गप्पाही अधिकारी-कर्मचारी खासगीत करीत असल्याचेही दिसून येत आहे. एकंदरच, तालुक्यातील वन विभागाच्या जमिनीबाबत असा वाद सुरू आहे. याचा गैरफायदा काही अनधिकृत व्यक्ती घेत आहेत. वनविभागाच्या जमिनीवर सर्रास वृक्षतोड होताना कारवाई कोणी करावी याचाही संभ्रम आहे. वन परिक्षेत्रातील जमिनीवरील वृक्ष रात्रीच तोडून ते परस्पर विक्री होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव, अनिल जायभाये यांनी केला आहे. वनपरिक्षेत्राजवळ काही शेतकऱ्यांचीही जमीन आहे. त्यामुळे काही शेतकरी वनपरिक्षेत्रातील झाडे तोडून तेथे शेतीही करू लागले आहेत. यामुळे तालुक्यातील वनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीवर कारवाईची मागणी आहे. वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करूपाटोदा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. काळे म्हणाले की, सौताडा येथील क्षेत्र पाटोदा कार्यालयाकडे देण्यात यावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरु आहेत. शिरुर येथील प्रकरणही वरिष्ठ पातळीवर आहे. असे असले तरी पाटोदा वनपरिक्षेत्रात रात्री किंवा इतर वेळी वृक्षतोड कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. वनपरिक्षेत्रात अनधिकृतपणे कोणी वृक्षतोड करीत असेल तर नागरिकांनी त्याची माहिती द्यावी.