शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जलकुंभांची स्थिती विदारक

By admin | Updated: July 8, 2016 23:50 IST

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतेअभावी अनेक टाक्यांमध्ये अक्षरश: कचरा आणि घाण साचली आहे. बऱ्याच टाक्यांची वरची झाकणेच गायब झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ या टाक्यांमध्ये पडते आहे. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही विदारक परिस्थिती समोर आली. संपूर्ण शहराला पिण्यासाठी मनपाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारे जायकवाडी धरणातून आधी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. या ठिकाणी विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शहरातील जलकुंभांमध्ये पोहोचविले जाते. मात्र यानंतर हे पाणी शुद्धच राहत असल्याचा समज चुकीचा असल्याची बाब गुरुवारी समोर आली. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील क्रांतीचौक, कोटला कॉलनी, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी, दिल्लीगेट, ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर, सेव्हन हिल, ज्योतीनगर, शहागंज, सिडको एन- ७ यांसह शहरातील विविध जलकुंभांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतेक जलकुंभांवरील लोखंडी झाकण गायब झाले आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, कचरा तसेच पावसाचे पाणी थेट या जलकुंभात जात आहेत. बऱ्याच ठिकाणी तळाला माती आणि कचरा साचलेला आहे. तर काही ठिकाणी शेवाळही आले आहेत. नियमानुसार जलकुंभांची ठराविकपणे स्वच्छता करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. क्रांतीचौक, कोटला कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, ज्युबली पार्क आदी ठिकाणी जलकुंभांवर दर्शविलेली स्वच्छतेची तारीख केव्हाच निघून गेलेली आहे. परंतु त्यानंतरही स्वच्छता झालेली नसल्याचे आढळून आले. फारोळा येथून शहरात शुद्ध पाणी येत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचताना पुन्हा दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेच्या तारखा नावालाचप्रत्येक जलकुंभाची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता होणे अपेक्षित आहे. स्वच्छता कधी केली गेली आणि पुढची स्वच्छता कधी करणार याच्या तारखा जलकुंभावर नोंदविणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जलकुंभांवर या तारखांची नोंदच नसल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी नोंदी असल्या तरी स्वच्छता करण्याची तारीख कधीच निघून गेलेली असली तरी अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे दिसून आले.