शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

जलकुंभांची स्थिती विदारक

By admin | Updated: July 8, 2016 23:50 IST

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतेअभावी अनेक टाक्यांमध्ये अक्षरश: कचरा आणि घाण साचली आहे. बऱ्याच टाक्यांची वरची झाकणेच गायब झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ या टाक्यांमध्ये पडते आहे. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही विदारक परिस्थिती समोर आली. संपूर्ण शहराला पिण्यासाठी मनपाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारे जायकवाडी धरणातून आधी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. या ठिकाणी विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शहरातील जलकुंभांमध्ये पोहोचविले जाते. मात्र यानंतर हे पाणी शुद्धच राहत असल्याचा समज चुकीचा असल्याची बाब गुरुवारी समोर आली. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील क्रांतीचौक, कोटला कॉलनी, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी, दिल्लीगेट, ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर, सेव्हन हिल, ज्योतीनगर, शहागंज, सिडको एन- ७ यांसह शहरातील विविध जलकुंभांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतेक जलकुंभांवरील लोखंडी झाकण गायब झाले आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, कचरा तसेच पावसाचे पाणी थेट या जलकुंभात जात आहेत. बऱ्याच ठिकाणी तळाला माती आणि कचरा साचलेला आहे. तर काही ठिकाणी शेवाळही आले आहेत. नियमानुसार जलकुंभांची ठराविकपणे स्वच्छता करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. क्रांतीचौक, कोटला कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, ज्युबली पार्क आदी ठिकाणी जलकुंभांवर दर्शविलेली स्वच्छतेची तारीख केव्हाच निघून गेलेली आहे. परंतु त्यानंतरही स्वच्छता झालेली नसल्याचे आढळून आले. फारोळा येथून शहरात शुद्ध पाणी येत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचताना पुन्हा दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेच्या तारखा नावालाचप्रत्येक जलकुंभाची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता होणे अपेक्षित आहे. स्वच्छता कधी केली गेली आणि पुढची स्वच्छता कधी करणार याच्या तारखा जलकुंभावर नोंदविणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जलकुंभांवर या तारखांची नोंदच नसल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी नोंदी असल्या तरी स्वच्छता करण्याची तारीख कधीच निघून गेलेली असली तरी अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे दिसून आले.