शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महावितरणचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर

By admin | Updated: June 17, 2016 00:35 IST

बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून,

बीड : पावसाळापूर्व महावितरणची दुरुस्ती कामे झालीच नाहीत. मध्यंतरीच्या वादळी-वाऱ्याने मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, विद्युत खांब व तारांच्या पडझडीमुळे जनावरेही दगावली आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याभरात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हंगामपूर्व दुरुस्तीची कामे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ शहरी भागात होत आहेत. ग्रामीण भाग महावितरणने वाऱ्यावर सोडल्याने मान्सूनपूर्व पावसातच पडझडीचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्याअखेर झालेल्या वादळी वाऱ्यात उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे सुमारे ४५० विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते. यामध्ये महावितरणने कोट्यवधीचे नुकसान झाले असून गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. मे महिन्यात वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून बीड तालुक्यातील करचुंडी येथील छावणीतील तब्बल २१ जनावरे तर परळी तालुक्यातील तळणी येथे विजेच्या धक्का लागून तीन जनावरे दगावल्याची घटना बुधवारी घडली.गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे फ्रिजमध्ये विद्युतप्रवाह संचारल्याने शेख नजीर शेख व अलिशान शेख नजीर या दोघांचा मृत्यू झाला होता. बीड तालुक्यातील नेकनूर येथे विद्युत तारेच्या धक्क्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक दुर्घटना होत असतानादेखील महावितरणने गांभिर्याने पाहिल नाही. तालुक्याची ठिकाणे वगळता ग्रामीण भागात आजही दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. वादळी वाऱ्याला सुरुवात होताच विद्युत खांबाची पडझड हे समीकरणच बनले आहे.यंदा महावितरणने हंगामपूर्व दुरूस्ती कामाच्या निविदाच काढल्या नव्हत्या. नुकसान झाल्यानंतर उपकेंद्रानुसार ५० लाखाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. असे असून दुरूस्तीचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने गावे अंधारात आहेत. (प्रतिनिधी)