शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

‘बीएचआर’च्या संचालकांना वैजापूर येथे पोलीस कोठडी

By admin | Updated: June 30, 2017 00:18 IST

वैजापूर : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या १४ संचालकांना वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या १४ संचालकांना वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. औैरंगाबादच्या सीआयडी विभागाने जळगाव येथील कारागृहातून या सर्वांना वैैजापूर कोर्टासमोर हजर केले असता विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. गायधने यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वैजापूर तालुक्यातील ८५ गुंतवणूकदारांची एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीआयडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीने २००९ मध्ये वैजापूर शहरात शाखा स्थापन केली. या शाखेत तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कालावधीत सोसायटीत जवळपास एक कोटी ४० लाख रुपया़च्या ठेवी ठेवण्यात आल्या. परंतु सोसायटीने गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता शहरातून आपला गाशा गुंडाळला व सर्व गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप मथुरादास वेद यांनी २० नोव्हेंबर २०१५ रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सोसायटीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पण त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. सीआयडीचे उपअधीक्षक सुरडकर यांनी केलेल्या तपासात वैजापूर तालुक्यातील ८५ गुंतवणुकदारांची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगाव येथील कारागृहात असलेल्या १४ संचालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करुन वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले. फिर्यादीतर्फे सरकारी वकील महेश कदम यांनी काम पाहिले.महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखाबीएचआरच्या (भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह पतसंस्था) महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. महाराष्ट्रात २५२ शाखा आहेत. बीएचआर अडचणीत आल्यावर २ फेब्रुवारी २०१५ रोजी संस्थापक प्रमोद रायसोनींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या पतसंस्थेच्या औरंगाबादसह मराठवाड्यातही अनेक शाखा होत्या. तेथील गुंतवणूकदारांचीही फसगत झाली आहे. आता ही संस्था बंद आहे.