शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

विकासाची दिशा ग्रामपंचायतींच्या हाती

By admin | Updated: June 25, 2016 00:44 IST

औरंगाबाद : गावांचा शाश्वत विकास अभिप्रेत आहे. या उद्देशानेच १४ व्या वित्त आयोगाचा ५४ कोटींचा पहिला ह प्ता सहा महिन्यांपूर्वीच थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला

औरंगाबाद : गावांचा शाश्वत विकास अभिप्रेत आहे. या उद्देशानेच १४ व्या वित्त आयोगाचा ५४ कोटींचा पहिला हप्ता सहा महिन्यांपूर्वीच थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. मात्र, ‘आमचं गाव आमचा विकास’ या माध्यमातून अगोदर ग्रामपंचायतींना चार वर्षांचा बृहत आराखडा तयार करावा लागेल.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी जि. प. सदस्य, पदाधिकाऱ्यांसाठी ग्रामपंचायतींच्या विकासासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती़ मात्र, ६० पैकी अवघ्या ११ सदस्यांनी हजेरी लावली. बैठकीस आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम व अर्थ समिती सभापती संतोष जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती शीला चव्हाण, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ, शैलेश क्षीरसागर, उज्ज्वला सोनवणे, अनुराधा चव्हाण, पुष्पा जाधव, शोभा नलावडे, विमल बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके या सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी ‘आमचं गाव आमचा विकास’ यासंबंधी प्रशिक्षक जयप्रकाश बागडे यांनी मार्गदर्शन केले़केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा केवळ ३० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला मिळत होता. कालांतराने यात बदल होऊन तो ७० टक्के निधी मिळू लागला. आता ग्रामपंचायतींना थेट १०० टक्के निधी मिळाला आहे. यामधून जिल्हा परिषद, पंचायत समितीला वगळण्यात आले आहे. गावचा विकास साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने ही भूमिका घेतली आहे़ याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंतचा समावेश करण्यात आला़ चार वर्षांचा बृहत आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.