शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आहार ‘लय भारी’!

By admin | Updated: August 27, 2014 01:38 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी आता केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर होणार आहे.

 

बीड : जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी आता केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर होणार आहे. यामाध्यमातून मोठ्या शहरांच्या धर्तीवर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोषण आहार अधिक पौष्टिक बनविला जाणार आहे. शिवाय स्वयंपाकगृहांमध्येही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्र्थ्यांना मोफत पोषण आहार दिला जातो. यात मूग, मटकी, भात, बिस्किटे दिले जातात. पालघर, भिवंडी या मोठ्या शहरांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी केंद्रीय स्वयंपाकगृह स्थापन करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार दिला होता. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीला चालना देण्यासाठी विस्तार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधून स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन स्वयंपाकगृह व दर्जेदार आहार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांकडूनच निधीची तरतूद केली जाईल. सध्या शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी ‘कुकींग कॉस्ट’ अंतर्गत शासनाकडून निर्धारित केलेल्या दराने प्रतीविद्यार्थी निधी दिला जातो. मात्र, आता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून आहारामध्येही सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये फळे, दूध व प्रथिनेयुक्त आहार देण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी गोविंद कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पत्र पाठविले आहे. या पत्रावरुन कार्यवाही करण्यास शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. किचनशेड होणार अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीअंतर्गत केवळ पौष्टिक आहार पुरविला जाणार आहे, असे नाही तर स्वयंपाकगृहाचे देखील रुपडे पालटण्यात येईल. किचन शेडमध्ये स्वच्छ पाणी, धान्य साठविण्यासाठी व्यवस्था असेल. विद्यार्थ्यांना ताजा व चवदार आहार उपलब्ध करुन दिला जाणार आहे़ (प्रतिनिधी) केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे अधिक पौष्टिक आहार भेटणार आहे. ४शिक्षण विभागाच्या पत्रावर कार्यवाही सुरु आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने लवकरच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात येईल. ४स्वयंसेवी संस्थांची नावे येताच ती वरिष्ठ कार्यालयास कळवू असे, शालेय पोषण आहार विभागातील लिपीक गणेश सारुक यांनी सांगितले. ४केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली जिल्ह्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़हजार ९०१ इतक्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. १ ते ८ इयत्तेचे विद्यार्थी लाभ घेतात.