शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

धारूर बनली उद्योगनगरी

By admin | Updated: April 14, 2015 00:51 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद महिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या

विशाल सोनटक्के , उस्मानाबादमहिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या या महिला आज पिठाच्या गिरणीपासून स्वस्त धान्य दुकानापर्यंतचा कारभार मोठ्या हिंमतीने सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या २ हजार लोकवस्तीच्या या गावात सुमारे सव्वादोनशेपेक्षा अधिक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असून, या महिलांचा त्यांच्या कुटुंबालाही मोठा आधार मिळतो आहे.उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावनजीक असलेल्या धारुरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही चळवळ उभारली गेली आहे. सद्यस्थितीत तेथे असलेल्या १६ पैकी सुमारे १४ बचत गटांच्या महिलांनी विविध उद्योग सुरु केले आहेत. जीवन ज्योती दुग्ध विकास महिला मंडळाच्या साळुबाई श्रीमंत रोकडे, मैनाबाई इंद्रजीत रोकडे, सरस्वती उबाळे, मनिषा बापूराव गायकवाड, प्रमोदिनी बिडवे, राणी सुरवसे आदी महिलांनी एकत्रीत येवून दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. तर भैरवनाथ गटाच्या चंद्रकला वाघमारे यांनी फुटवेअरचे आणि लता वाघमारे यांनी किराणा दुकान उभारले आहे. दिक्षा महिला बचत गटाच्या रंजना गायकवाड, कोमल गायकवाड यांनी पिठाची गिरणी तर सुजाता गायकवाड यांनी या गटाच्या माध्यमातूनच स्वस्त धान्य दुकान चालविण्यास घेतले आहे. संगीता वाघमारे बचत गटाच्या माध्यमातून शिलाईचे दुकान टाकले आहे. याबरोबरच बांगडी विक्री, शेळी पालन, कुक्कुटपालन यासह केळी आणि आंब्याच्या बागाही या महिला अत्यंत समर्थपणे सांभाळत असल्याचे दिसून येते. जीवन ज्योती गटाच्या महिलांनी दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत येथे सुमारे १०० लिटर दुधाचे संकलन होत असले तरी येणाऱ्या काळात हा उद्योग वाढेल, असा विश्वास त्यांना वाटतो. केवळ दूध संकलनावरच न थांबता भविष्यात खवा, पनीर, रसगुल्ले, लस्सीसह दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी या महिलांनी प्रशिक्षणही घेतले आहे. दूधाचे संकलन करताना जनावरांचे गोठे, पाणी, चारा व्यवस्थापन आदीबाबतही त्या इतरांना मार्गदर्शन करीत आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून बँक व्यवहाराबरोबरच इतर बाबींची चांगली माहिती झाल्याचे सांगत, ग्रामसभेलाही आमची आवर्जून उपस्थिती असते असे या महिलांनी सांगितले. विशेष म्हणजे या गटाच्या महिला गावातील स्वस्त धान्य दुकानही अतिशय कुशलपणे सांभाळत आहेत. पूर्वी गावात रेशन दुकान नव्हते. त्यामुळे १० किमीवरील वाडीबामणी अथवा ७ किमीवर असलेल्या केशेगावला जावे लागत होते. गावात स्वस्त धान्य दुकान सुरु व्हावे, अशी मागणी आम्ही लावून धरली. यासाठी संघर्ष केला. आज बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही हे दुकान चालवित असल्याचे सरस्वती उबाळे यांनी सांगितले. बचत गटामुळे आमच्या जीवनाला अर्थ लाभल्याचे सांगत, आज स्वकष्टाने मी माझ्या मुलीला तंत्रनिकेतनच्या अभ्यासासाठी बाहेरगावी ठेवल्याचेही त्या म्हणाल्या. उबाळे यांच्याप्रमाणेच सुवर्णा धन्यकुमार भोसले या महिलेचीही यशोगाथा आहे. पाच वर्षापूर्वी मजुरी करणाऱ्या या महिलेने २०११ मध्ये तुळजाभवानी गटाच्या माध्यमातून पावणेदोन लाखाचा खर्च करुन लाँड्री टाकली आहे. यासाठी हायड्रो आणि वॉशिंगची यंत्रे खरेदी केली. आज या लाँड्रीकडे तुळजापूरच्या सैनिकी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याचे टेंडर असून, श्री तुळजाभवानी देवस्थानसह तुळजापुरातील विविध लॉजमधील कपडे धुण्यासाठी टेम्पोने त्यांच्याकडे येतात. पूर्वी तुळजापूरला जाण्यासाठी बसच्या तिकीटाचे ५ रुपये नसायचे. मात्र या उद्योगाच्या माध्यमातून कुटुंब उभे राहिल्याचे सुवर्णा भोसले अत्यंत अभिमानाने म्हणाले.