शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विकासकामांची बांधकामे निकृष्ट

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध

सास्ती : नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. काही कामे तर अर्धवट सोडून दिल्याचेही चित्र दिसून येत आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जात असल्याचे चित्र राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर येथील गाव तलावाच्या तसेच याच भागातील पेल्लोरा-किन्हीबोडी या रस्त्याच्या कामाकडे पाहिल्यावर दिसून येत आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत २० लाख ३९ हजार ६२ रुपयांच्या गावतलावाचे काम मंजूर करण्यात आले. मोठ्या थाटामाटात कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु तलावाचे काम अगदीच निकृष्ट दर्जाच्या केल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पारीला भोके पडून व भेगा जाऊन तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न तर भंगलेच. परंतु शासनाचा लाखो रुपयांचा निधीसुद्धा व्यर्थ गेला. याच परिसरातील पेल्लोरा ते किन्हबोडी या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे २० लाखांचे काम मंजूर आहे. मात्र काम अजूनही थंडबस्त्यात आहे. रस्त्याच्या कडेवर गिट्टी-माती टाकून ठेवण्यात आली आहे. परंतु काम पूर्ण झाले नाही. जे काम केले तेही निकृष्ट दर्जाचे आहे. (वार्ताहर)