शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

राजुरेश्वर मंदिर विकासाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

श्याम पुंगळे , राजूरखा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराच मोठा विकास साधला जाईल.

 श्याम पुंगळे ल्ल राजूर भोकरदन तालुक्याचे भूमिपुत्र खा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराला भरभरून निधी मिळून निश्चितच मोठा विकास साधला जाईल. अशी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त केली जात असून राजूरेश्वर मंदिराच्या विकासाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी राजुरेश्वर मंदिराला ब दर्जा प्राप्त झाला आहे. त्यादृष्टीने गणपती संस्थानने सुमारे ६० कोटी रूपये खर्चाचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने परिसर विकास कामे संथ गतीने सुरू आहे. खा.रावसाहेब दानवे यांचा मंंंंंंंंंंंंंंंंंत्रिमंडळात समावेश झाल्याने मंदिर परिसर विकास कामाला निधी मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. विशेष म्हणजे दानवे हे गणपती संस्थानचे विश्वस्त सचिव आहेत. त्यामुळे ते मंदिर परिसर विकास कामाकडे विशेष लक्ष देऊन शिर्डी, शेगावच्या धर्तीवर राजुरेश्वर मंदिराचा विकास साधून कायापालट करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या राजूर येथे भाविकांसाठी भक्तनिवास, व्यापारी गाळे, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय आदी समस्या आहेत.तसेच जालना भोकरदन रस्त्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. हा राज्य महामार्ग असून राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा राबता अधिक आहे. रस्त्याचे काम झाल्यास दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढून या मार्गावर दळणवळण वाढणार आहे. जालना भोकरदन रस्त्याला जनता अक्षरश: कंटाळलेली आहे. मात्र दानवेंच्या रूपाने रस्त्याचे भाग्य उजळण्याची आशा नागरिकांत निर्माण झाली आहे. तसेच राजूर ते फुलंब्री, राजूर ते टेंभूर्णी या रस्त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातच शेतकरी हितासाठी अपूर्र्ण असलेल्या बाणेगाव व पळसखेडा खरात येथील मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती देऊन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन हा परिसर सुजलाम् सुफलाम् करतील, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे. बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी जालना भोकरदन मुख्य रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. प्रकल्पाची उंची वाढवता येणार आहे. पळसखेडा खरात येथील मध्यम प्रकल्पाच्या कामात प्रमुख अडसर असलेल्या हिवरा दाभाडी येथील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. पळसखेडा येथील प्रकल्प पुर्णत्वास जाऊन परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांंचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. राजूर परिसरात शैक्षणिक व आरोग्य सुविधा काही प्रमाणात समाधानकारक असल्या तरी त्यामधे सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. दानवे तालुक्याचे भूमिपुत्र असून त्यांना या भागातील खडान्खडा माहीती आहे, त्यामुळे वरील समस्यासह अन्य प्रलंबित कामे ते निश्चित मार्गी लावून मंत्रिपदाचा सदुपयोग या भागासाठी करतील, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.