शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:03 IST

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना ...

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना या खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, तो त्रासदायक ठरत आहे. औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

खुलताबाद तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी यांना सोयीचा असलेला आणि खुलताबाद तालुक्यातील बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा-औरंगाबाद रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन केले होते. परिणामी महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून डांबरीकरणाचे काम अर्धवट झालेले आहे. रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरण करणे बाकी आहे. तसेच गोळेगाव ते काटशिवरी हा दोन किलोमीटर रस्ता केवळ मातीचा भराव घालून अर्धवट सोडण्यात आला आहे, तर ओहर गावापासून शहरापर्यंत रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा असल्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी, औरंगाबाद शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता खराब असल्याने रात्री-अपरात्री नागरिकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यांचे उर्वरित काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी हे गंगापूर तालुक्यातील असल्याने त्यांचेे खुलताबाद तालुक्यातील विकासकामांकडे सतत दुर्लक्ष होत असते. खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद- म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा, खुलताबाद ते फुलंब्री या मार्गाचे काम जाणूनबुजून पूर्ण केले जात नाही. धामणगाव -लोणी -बोडखा , खुलताबाद- खिर्डी, वेरूळ, दावल ते धुळे राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. या रस्त्यांच्या कामांना सुरू होऊन दोन ते तीन वर्षे होत आहेत. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे जिवंतपणी मरणयातना भोगत आहे.