शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:03 IST

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना ...

खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामु‌ळे नागरिकांना या खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, तो त्रासदायक ठरत आहे. औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

खुलताबाद तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी यांना सोयीचा असलेला आणि खुलताबाद तालुक्यातील बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा-औरंगाबाद रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन केले होते. परिणामी महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून डांबरीकरणाचे काम अर्धवट झालेले आहे. रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरण करणे बाकी आहे. तसेच गोळेगाव ते काटशिवरी हा दोन किलोमीटर रस्ता केवळ मातीचा भराव घालून अर्धवट सोडण्यात आला आहे, तर ओहर गावापासून शहरापर्यंत रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा असल्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी, औरंगाबाद शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता खराब असल्याने रात्री-अपरात्री नागरिकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यांचे उर्वरित काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी हे गंगापूर तालुक्यातील असल्याने त्यांचेे खुलताबाद तालुक्यातील विकासकामांकडे सतत दुर्लक्ष होत असते. खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद- म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा, खुलताबाद ते फुलंब्री या मार्गाचे काम जाणूनबुजून पूर्ण केले जात नाही. धामणगाव -लोणी -बोडखा , खुलताबाद- खिर्डी, वेरूळ, दावल ते धुळे राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. या रस्त्यांच्या कामांना सुरू होऊन दोन ते तीन वर्षे होत आहेत. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे जिवंतपणी मरणयातना भोगत आहे.