शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार

By admin | Updated: July 15, 2014 01:01 IST

औरंगाबाद : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

औरंगाबाद : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार येथील संत तुकोबाराय नाट्यगृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्याचे संपर्क नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आ. सतीश चव्हाण, आ. संजय वाघचौरे, आ. चंद्रकांत दानवे, माजी खा. मौलाना उबेदउल्ला खान आझमी, विद्या चव्हाण, नीलेश राऊत, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य, स्फूर्ती व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्यात जिल्हानिहाय निर्धार मेळावे घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. या मेळाव्याचा प्रारंभ पालघर येथून करण्यात आला. सोमवारी औरंगाबादेत झालेल्या या मेळाव्यात जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून ‘निवडणुकीला सामोरे जाताना खचून न जाता मोठ्या हिमतीने, विश्वासाने सामोरे जा, सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा, गेल्या १० वर्षांत सरकारने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती द्या. पारावर, ओट्यावर, सार्वजनिक चर्चा करताना नेहमी सकारात्मक चर्चा करा. लोकांना आत्मविश्वास द्या. पक्षाचा नेता, नीती, कार्यक्रम, कार्यकर्ता व संघटन या पंचसूत्रीबद्दल लोकांमध्ये जाऊन चर्चा करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाऊ. लोकसभेची आता झालेली निवडणूक ही चमत्कारिक होती. मोदी सरकारने अल्पावधीत लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.आपणास उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे. पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवा. दिलेला उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता तो पक्षाचा उमेदवार आहे. तो निवडून आलाच पाहिजे, यासाठी कामाला लागा, असा सल्ला पवार यांनी दिला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील बदललेले चित्र बघता कार्यकर्त्यांमध्ये हतबलता आली. कार्यकर्त्यांनी निराश न होता मोठ्या धैर्याने आतापासूनच विधानसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे. संपर्क नेते राजेश टोपे म्हणाले की, पक्ष निश्चित करील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धाराने कामाला लागावे. औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधानसभेच्या ३ जागा आहेत. आणखी २ जागा वाढवून दिल्या, तर त्या पाचही जागा आम्ही निवडून आणू. यावेळी राज्यमंत्री फौजिया खान व माजी खा. मौलाना उबेदउल्लाह खान, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद व कार्याध्यक्ष विनोद पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी केले.प्रभावी प्रचार यंत्रणा राबवाअजित पवार यांनी भाषणात सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी योग्य व प्रभावी प्रचार यंत्रणा राबवा. पक्षाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करा. कार्यकर्त्यांना माणूस जोडण्याच्या बेरजेचे राजकारण करता आले नाही तरी चालेल; पण वजाबाकीचे राजकारण मात्र करू नका.