शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

उदासिनतेमुळे आरटीओ कार्यालयाची दुरवस्था

By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST

अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंदच्या शिफारशीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालय सावरू शकले नाही

अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंदच्या शिफारशीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालय सावरू शकले नाही, असा आरोप होऊ लागला आहे. आजतागायत एकही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाईत राहिले नाहीत. लातूरमध्ये राहूनच कार्यालयीन कामकाज हाकण्यात त्यांनी धन्यता मानली. नोव्हेंबर २००४ मध्ये अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित झाले. एम. एच. ४४ हा क्रमांक या कार्यालयाला प्राप्त झाला. शंभर किलोमीटरचा पल्ला गाठून कामे करण्याची मोठी नामुष्की या परिसरातील वाहनधारकांना करावी लागायची. तो प्रश्न या कार्यालयामुळे मार्गी लागला. अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, धारूर, वडवणी, अशा सहा तालुक्यांचा समावेश या कार्यालयाकडे झाला. बहुतांश अधिकाऱ्यांनी लातूरहूनच कार्यालयाचा कारभार हाकला. दोन लिपिक व दलालांच्या हाती सोपविला होता. अनेकदा तर कागदपत्रांचे गठ्ठे जमा करून कर्मचारी व दलाल लातूराहून सह्या घेऊन यायचे. दहा वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाईसाठी कसलेही पथक स्थापन झाले नाही. अथवा कोणत्या वाहनावर कारवाईही झाली नाही. महसूल जमा करणे व गाडयांची पासिंग व लायसन्सचे वितरण एवढेच असल्याचे अंबाजोगाईकरांनी पाहिले. कार्यालयाला स्वत:ची इमारतही मिळाली नाही. दरम्यान या कार्यालयातून महिन्याकाठी ८०० ते ९०० वाहनांच्या नोंदी होत आहेत. असे असतानाही कार्यालय गुंडाळण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची गैरसोय होणार आहे. शेजारच्या तालुक्यांनाही झळ बसेल. (वार्ताहर) महसूल कमी येणे, गुंडगिरी, दादागिरी, पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असणे, वाहनांचे अधिकृत विके्रते नाहीत, कार्यालय सुस्थितीत आणण्यासाठी १५ कोटींचा भुर्दंड अशी विविध कारणे दाखवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सुरू आहे. ४हा डाव हाणून पाडून संघर्षातून मिळालेले हे कार्यालय सुरू राहिल. यासाठी पुन्हा संघर्ष करू अशी प्रतिक्रिया डॉ. द्वारकादास लोहिया यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. ४जिल्हा निर्मितीसाठी असलेली आवश्यक कार्यालये अंबाजोगाईमध्ये आहेत. त्यात आरटीओचाही समावेश आहे. त्यामुळे हे कार्यालय कदापी बंद करू दिले जाणार नाही.