शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकऱ्यांच्या विरोधातील कारवाई थांबविण्याची मागणी

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

परभणी: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी पोलिस बळाचा वापर करुन विद्यापीठ प्रशासन ताब्यात घेत आहे.

परभणी: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी पोलिस बळाचा वापर करुन विद्यापीठ प्रशासन ताब्यात घेत आहे. ही कारवाई थांबवावी, अन्यथा शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन उभारेल, असा इशारा कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात दिला आहे.स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कुलगुरुंना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शेंद्रा, बलसा, सायाळा येथील शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर पोलिस बळाचा वापर करुन आम्हाला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. २०-२५ वर्षांपासून विद्यापीठाने या जमिनी पडित ठेवल्या आहेत. ज्या उद्दिष्टासाठी विद्यापीठाने शेतकऱ्यांकडून नाममात्र मावेजा देऊन ताब्यात घेतल्या होत्या ते उद्दिष्ट जमिनी पडित ठेवून संपुष्टात आले आहे. कायद्याप्रमाणे विद्यापीठाने या जमिनी मूळ मालकाला परत करायला हव्यात. परंतु, त्याऐवजी शेतकऱ्यांना जमिनीतून बाहेर काढले जात आहे. विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २३८० हेक्टर जमीन अतिरिक्त असल्याचेच म्हणजेच ही जमीन उपयोगी नसल्याचे म्हटले आहे आणि त्या अतिरिक्त जमिनीपैकीच या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठाचे संपादित केल्या. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना विद्यापीठ किंवा इतरत्र सरकारी सेवेत सामावून घेणे कायद्याने बंधनकारक होते. परंतु, शेतकरी कुटुंबियांना या लाभापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना परस्पर न्याय मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे आणि न्यायालयानेही शेतकऱ्यांचे ताबे मान्य केले आहेत. या उपरही होत असलेली ही कारवाई अन्यायकारक असून ती थांबावावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर उच्चाधिकार समिती सदस्य गोविंद जोशी, जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, रामभाऊ शिंदे, मदन शिंदे, भास्कर खटींग, अनंत पवार, रंगनाथ चोपडे, उद्धव जवंजाळ, गोपाळ लोंढे, किशोर ढगे आदींची नावे आहेत.(प्रतिनिधी)