शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून दुबार पंचनाम्याची मागणी

By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST

बीड: गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़

बीड: जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तयारी शासनाने दाखवली़ मात्र शासन निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे़ एवढेच काय तर एकट्या पाटोदा तालुक्यातून दोन हजार शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे दुबार पंचनामे करण्याची मागणी केली आहे. गारपिटीत चाळीस टक्के नुकसान झाले काय? अन् पन्नास टक्के झाले काय? शेवटी आमच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे, अशा प्रतिक्रिया गारपीटग्रस्त शेतकर्‍यांमधून येत आहेत. एकट्या पाटोदा तालुक्यातून दुबार पंचनाम्यासाठी दोन हजार अर्ज आले आहेत़ राज्यासह बीड जिल्ह्यात मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीसह वादळ वार्‍यांमुळे शेतकर्‍यांच्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्यांनाच दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा मोबदला मिळणार आहे. या शासन धोरणामुळे शेतकरी उध्द्वस्त झाला आहे. एकट्या पाटोदा तालुक्यातून शनिवारपर्यंत दोन हजार शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालयाला निवेदन देऊन गारपिटीत झालेल्या नुकसानीचे दुबार पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. पंचनाम्यांची तपासणी करणार जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी दुबार पंचनाम्याची मागणी केलेली आहे. यावरून सर्वप्रथम तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करण्यात येईल. याबरोबरच मी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पहाणी करणार आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीवर तोडगा काढण्यात येईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. निकष चुकीचेच आस्मानी संकटांमुळे शेतकर्‍यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. गारपीटीत जरी चाळीस टक्के नुकसान झालेले असले तरी काळ्या पडलेल्या ज्वारी अथवा गव्हाला कोण घेणार? असा सवाल बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील सरपंच अंकुश गोरे यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)