शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

एलईडीच्या दोषींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल कंत्राटदाराच्या बाजूने गेल्याने चुकीची निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. एलईडीच्या कंत्राटदाराला दरमहा २ कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी बापू घडामोडे यांनी पैसे कोठून आणायचे आणि शहराचा विकास कसा करायचा असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी सविस्तर खुलासा केला. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी अटी-शर्ती कंपनीच्या बाजूने तयार केल्या जातात, समांतरचा करारदेखील असाच एकतर्फी आहे, तत्कालीन आयुक्त निविदेवर सह्या कशा काय करतात, निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. नंदकुमार घोडेले यांनी एलईडीची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी अशी मागणी केली. दिलीप थोरात, माधुरी अदवंत यांनीही एलईडीच्या चर्चेत भाग घेतला. राजू शिंदे यांनी पाणीपट्टीसाठी मनपाने स्वतंत्र बँक खाते उघडून कराराचा भंग केला आहे, त्यामुळे समांतरचा निर्णयदेखील भविष्यात मनपाच्या विरोधात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. डेंग्यूच्या आजारावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. डेंग्यूने थैमान वाढले असून, तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नंदकुमार घोडेले, ज्योती पिंजरकर, ज्योती नाडे, कीर्ती शिंदे, राज वानखेडे यांनी केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी फवारणीसाठी ८६ कर्मचारी असून, २५ पैकी १३ फॉगिंग मशीन बंद आहेत, अशी माहिती दिली. शहरात फवारणीसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅक्टर कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांच्या अनुपस्थित सभा सांभाळणारे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दिले. ग्रामपंचायतीच्या एनओसी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या सावंगी, तीसगाव, आडगाव, खांडेवाडी-नायगव्हाण येथील जागा ग्रामपंचायतीची एनओसी घेतल्यानंतरच अंतिम करण्यात याव्यात असा निर्णय सभेत घेण्यात आला. नंदकुमार घोडेले यांनी ग्रामपंचायतीची एनओसी असल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली.