शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीच्या दोषींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याच्या प्रकरणात मनपाला तब्बल २३१ कोटींचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल कंत्राटदाराच्या बाजूने गेल्याने चुकीची निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. एलईडीच्या कंत्राटदाराला दरमहा २ कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकरणी बापू घडामोडे यांनी पैसे कोठून आणायचे आणि शहराचा विकास कसा करायचा असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी सविस्तर खुलासा केला. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी अटी-शर्ती कंपनीच्या बाजूने तयार केल्या जातात, समांतरचा करारदेखील असाच एकतर्फी आहे, तत्कालीन आयुक्त निविदेवर सह्या कशा काय करतात, निविदा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. नंदकुमार घोडेले यांनी एलईडीची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी अशी मागणी केली. दिलीप थोरात, माधुरी अदवंत यांनीही एलईडीच्या चर्चेत भाग घेतला. राजू शिंदे यांनी पाणीपट्टीसाठी मनपाने स्वतंत्र बँक खाते उघडून कराराचा भंग केला आहे, त्यामुळे समांतरचा निर्णयदेखील भविष्यात मनपाच्या विरोधात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. डेंग्यूच्या आजारावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. डेंग्यूने थैमान वाढले असून, तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नंदकुमार घोडेले, ज्योती पिंजरकर, ज्योती नाडे, कीर्ती शिंदे, राज वानखेडे यांनी केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी फवारणीसाठी ८६ कर्मचारी असून, २५ पैकी १३ फॉगिंग मशीन बंद आहेत, अशी माहिती दिली. शहरात फवारणीसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅक्टर कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांच्या अनुपस्थित सभा सांभाळणारे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी दिले. ग्रामपंचायतीच्या एनओसी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या सावंगी, तीसगाव, आडगाव, खांडेवाडी-नायगव्हाण येथील जागा ग्रामपंचायतीची एनओसी घेतल्यानंतरच अंतिम करण्यात याव्यात असा निर्णय सभेत घेण्यात आला. नंदकुमार घोडेले यांनी ग्रामपंचायतीची एनओसी असल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली.