शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

लॉकडाऊनमुळे पदवीचा निकाल लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोक बाधित झाले. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत चालल्यामुळे शासनाने प्रतिबंधात्मक पाऊले ...

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोक बाधित झाले. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत चालल्यामुळे शासनाने प्रतिबंधात्मक पाऊले उचलली. त्यामुळे विद्यापीठाला सुरू असलेल्या पदवी परीक्षाही मधूनच स्थगित कराव्या लागल्या, तर दुसरीकडे अजूनही अनेक महाविद्यालयांनी झालेले पेपर तपासून संबंधित विषयांचे गुण विद्यापीठाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आता कोलमडले आहे. १६ मार्चपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पारंपरिक (बीए, बीकॉम, बीएस्सी) पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ६ एप्रिलपासून अभियांत्रिकी, फार्मसीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्या, तर ७ एप्रिलपासून बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षाही सुरू झाल्या होत्या. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे महाविद्यालय हेच परीक्षा केंद्र निश्चित केले होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे राज्य शासनाने परीक्षा थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरू असलेल्या या परीक्षा १५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आल्या आहेत.

तथापि, विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्याचे सुरुवातीलाच नियोजन केले होते. त्यानुसार विद्यापीठामार्फत त्या त्या महाविद्यालयांना झालेल्या पेपरची ‘अन्सर की’ दुसऱ्या दिवशी पाठवण्यात येत होती. प्राध्यापकांनी पेपर तपासल्यानंतर विषयनिहाय गुण विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु अजूनही अनेक महाविद्यालयांनी २० टक्के पेपरचे विषयनिहाय गुण विद्यापीठाकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्नित महाविद्यालयांना ऑफलाइन पेपरचे मूल्यांकन पाठविण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

चौकट....

महाविद्यालयांचे निकाल राखीव राहतील

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी गुरुवारी यासंबंधी संबंधित सर्व महाविद्यालयांना एका पत्राद्वारे इशारा दिला आहे की, ८० टक्के पेपरच्या गुणांचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. उर्वरित २० टक्के पेपरच्या गुणांचा अहवाल महाविद्यालयांनी २९ एप्रिलपर्यंत पाठविला नाही, तर गुणांचा अहवाल ऑनलाइन सादर करण्याबाबतची पोर्टलवरची सुविधा त्यानंतर काढून घेण्यात येईल आणि अशा महाविद्यालयांचे निकाल राखील ठेवण्यात येतील.