शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

फिल्टरबेडसाठी सुरक्षा रक्षक नेमणार

By admin | Updated: March 15, 2016 01:04 IST

अंबड : येथील जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरबेडची सुरक्षा वाऱ्यावरच असे वृत्त प्रकाशित करताच या ठिकाणी पालिका सुरक्षारक्षक नेमण्यासोबतच रात्रीची गस्त वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.

अंबड : येथील जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरबेडची सुरक्षा वाऱ्यावरच असे वृत्त प्रकाशित करताच या ठिकाणी पालिका सुरक्षारक्षक नेमण्यासोबतच रात्रीची गस्त वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.जालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षा रामभरोसे असून, जालना व अंबड पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे.लोकमतने रविवारी सकाळी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब उघडकीस आली होती. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१० कोटी रुपये खर्चुन जायकवाडी-जालना ही योजना पूर्णत्वास आली. जालना शहरातील सुमारे ४ लाख नागरिकांसाठी दररोज २० एमएलडी तर अंबडमधील ३१ हजार ५२१ नागरिकांसाठी दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. याविषयी अधिक माहिती देताना पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे म्हणाले, जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे हे अत्यंत महत्वपूर्ण फिल्टर बेड आहे. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी आहेत. आवश्यक असल्यास खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्या येईल. त्याचबरोबर रात्रीची गस्तही वाढविण्यात येणार आहे. कोणी टँकरद्वारे येथून पाणी चोरी करत असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नगर पालिकेकडून या फिल्टरबेडची लवकरच तपासणी करण्यात येईल. (वार्ताहर)