शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वाळू उपशाच्या अहवालाला दिला खो

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

हिंगोली : लिलावामध्ये सुटलेल्या वाळू घाटातून किती ब्रास वाळूचा उपसा झाला, या बाबतचा अहवाल संबंधित कंत्राटदाराने कधीही तहसील कार्यालयाकडे दिला नाही

हिंगोली : लिलावामध्ये सुटलेल्या वाळू घाटातून किती ब्रास वाळूचा उपसा झाला, या बाबतचा अहवाल संबंधित कंत्राटदाराने कधीही तहसील कार्यालयाकडे दिला नाही आणि तहसील कार्यालयांनी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तो मागितला नसल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटातून बेसुमार वाळूचा उपसा होत असताना याकडे महसूल विभागाने लक्षच दिलेले नाही. शिवाय ज्या वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. त्या वाळू घाटातून किती ब्रास वाळू संबंधित कंत्राटदारांनी घ्यायची आहे व किती महसूल त्याने जमा केला आहे? या बाबतची माहिती संबंधित कंत्राटदाराने तहसील कार्यालयाला देणे आवश्यक आहे. वाळू उपशाबाबत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून तहसीलदारांना या बाबतचा अहवाल देणे बंधणकारक असताना ही जबाबदारी एकाही ठिकाणी पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाचही तहसील कार्यालयांनी या बाबत कधीही संबंधिताकडून अहवाल मागविला नाही आणि तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयानेही कधीही अशा प्रकारच्या अहवालाची मागणी केली नाही. त्यामुळे बोलीतून वाळू घाट मिळविलेल्या कंत्राटदारांना रान मोकळे होते. बेसुमार वाळूचा उपसा त्यांच्याकडून केला जातो. अधिकारी मात्र ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगुन दुर्लक्ष करतात. शिवाय यासाठी कमी मनुष्यबळ, अधिकारांची कमतरता, पोलिसांचे असहकार्य अशी तकलादू कारणे सांगितली जातात. परिणामी शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मुकावा लागतो. याकडे एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने नदी व ओढ्यांचा नैसर्गिक समतोल बिघडत आहे. (समाप्त)