शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते आठ ठिकाणी लोकार्पण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:05 IST

औरगाबाद: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) शहरातील आठ विविध विकासकामांचे ...

औरगाबाद: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) शहरातील आठ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळेदेखील शहरात येणार आहेत. परंतु, त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चार हात दूर ठेऊन शिवसेनेने निवडणूक अजेंडा राबविण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

या विविध कामांच्या लोकार्पणासाठी ते येणार

कांचनवाडी येथील बायोगॅस प्रक्रिया, युएनडीपी ड्राय वेस्ट सेंटरचे लोकार्पण, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रोड मार्गावर सायकल ट्रॅकचे लोकार्पण, पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील कमांड कंट्रोल सीसीसी सेंटरचे लोकार्पण, टीव्ही सेंटर येथील मिनी स्टेडियम आणि बीओटी शॉपिंग कॉम्पलेक्सचे लोकार्पण, त्यानंतर अमरप्रीत चौक येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण, पडेगाव येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आऊटडोअर डिस्प्लेचे लोकार्पण, बसथांब्यांचे भूमिपूजन, चिकलठाणा येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे, असे शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याच दिवशी आदित्य ठाकरे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी सायंकाळी ६ वाजता एका हॉटेलात संवाद साधणार आहेत.

ठाकरे, देसाई यांना मनपाने निमंत्रित केले आहे

१६ जानेवारी रोजी खा.सुळे शहरात आहेत. त्यांना या कार्यक्रमांसाठी का नाही बोलाविले, तसेच काँग्रेसच्या मंत्र्यांना निमंत्रित केले आहे काय, यावर आ. दानवे यांनी पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री देसाई यांना मनपाने निमंत्रित केल्याचे सांगितले.

चौकट...

मनपाने टाळले तरी शिवसेनेने काळजी घ्यावी

महापालिका प्रशासकांनी महाविकास आघाडी सरकार म्हणून जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनादेखील कार्यक्रमांना निमंत्रित केले पाहिजे. मनपाने टाळले असले तरी शिवसेना नेत्यांनी तिन्ही पक्षांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.