शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पर्यटनमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते आठ ठिकाणी लोकार्पण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:05 IST

औरगाबाद: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) शहरातील आठ विविध विकासकामांचे ...

औरगाबाद: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) शहरातील आठ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळेदेखील शहरात येणार आहेत. परंतु, त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चार हात दूर ठेऊन शिवसेनेने निवडणूक अजेंडा राबविण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

या विविध कामांच्या लोकार्पणासाठी ते येणार

कांचनवाडी येथील बायोगॅस प्रक्रिया, युएनडीपी ड्राय वेस्ट सेंटरचे लोकार्पण, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रोड मार्गावर सायकल ट्रॅकचे लोकार्पण, पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील कमांड कंट्रोल सीसीसी सेंटरचे लोकार्पण, टीव्ही सेंटर येथील मिनी स्टेडियम आणि बीओटी शॉपिंग कॉम्पलेक्सचे लोकार्पण, त्यानंतर अमरप्रीत चौक येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण, पडेगाव येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आऊटडोअर डिस्प्लेचे लोकार्पण, बसथांब्यांचे भूमिपूजन, चिकलठाणा येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे, असे शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याच दिवशी आदित्य ठाकरे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी सायंकाळी ६ वाजता एका हॉटेलात संवाद साधणार आहेत.

ठाकरे, देसाई यांना मनपाने निमंत्रित केले आहे

१६ जानेवारी रोजी खा.सुळे शहरात आहेत. त्यांना या कार्यक्रमांसाठी का नाही बोलाविले, तसेच काँग्रेसच्या मंत्र्यांना निमंत्रित केले आहे काय, यावर आ. दानवे यांनी पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री देसाई यांना मनपाने निमंत्रित केल्याचे सांगितले.

चौकट...

मनपाने टाळले तरी शिवसेनेने काळजी घ्यावी

महापालिका प्रशासकांनी महाविकास आघाडी सरकार म्हणून जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनादेखील कार्यक्रमांना निमंत्रित केले पाहिजे. मनपाने टाळले असले तरी शिवसेना नेत्यांनी तिन्ही पक्षांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.