शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:06 IST

शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर ...

शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पीक लावण्याच्या अगोदर शेतात शेणखत पांगवतात. रासायनिक खतासोबत शेणखताची मात्रा दिली, तर पीक जोमदार येऊन हमखास उत्पादन मिळते. त्यामुळे दरवर्षी शेणखत टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची संख्या कमी होत आहे. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावारांची किंमत वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत. या परिस्थितीत शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सेंद्रिय शेतीमुळे वाढली मागणी

सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. यात शेणखताला महत्त्व असल्याने शेतकरी शेणखत खरेदीसाठी दारोदार भटकत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे शेणखत आहे, ते स्वतःच्या शेताला प्राधान्य देत असून, त्यांची गरज भागल्यानंतर शेणखताची विक्री करतात. सध्या चार हजार ते पाच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेणखताची विक्री सुरू आहे. ही रक्कम मोजूनही मुबलक शेणखत मिळण्याची खात्री नाही.