शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

गुरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:06 IST

शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर ...

शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पीक लावण्याच्या अगोदर शेतात शेणखत पांगवतात. रासायनिक खतासोबत शेणखताची मात्रा दिली, तर पीक जोमदार येऊन हमखास उत्पादन मिळते. त्यामुळे दरवर्षी शेणखत टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची संख्या कमी होत आहे. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावारांची किंमत वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत. या परिस्थितीत शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सेंद्रिय शेतीमुळे वाढली मागणी

सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. यात शेणखताला महत्त्व असल्याने शेतकरी शेणखत खरेदीसाठी दारोदार भटकत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे शेणखत आहे, ते स्वतःच्या शेताला प्राधान्य देत असून, त्यांची गरज भागल्यानंतर शेणखताची विक्री करतात. सध्या चार हजार ते पाच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेणखताची विक्री सुरू आहे. ही रक्कम मोजूनही मुबलक शेणखत मिळण्याची खात्री नाही.