शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ...

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड वर्षाच्या कालावधीत १४३ मुली घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १० मुलींचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचा शोध बाल सहाय्य पोलीस पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून केला जात आहे.

औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना अल्पवयीन म्हणून ओळखले जाते. या वयात त्यांना फारशी समज नसते. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. तर काही जण मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेतात. तर काही मुली स्वत:हून घरातून निघून जातात. मुलींना वाममार्गाला लावणारे लोकही मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून घरातून पळवून नेतात. अशा वेगवेगळ्या कारणातून शहरात गतवर्षी २०२० मध्ये ९६ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ९२ मुलींचा शोध लावण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४७ मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. यापैकी ४१ मुलींचा शोध पोलिसांनी लावला.

--------------------

आलेख

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली आणि कंसात सापडलेल्या मुलींची संख्या

वर्ष

२०१८- १४० (१३८)

२०१९- १३३- (१३०)

२०२०- ९६- (९२)

मे २०२१ पर्यंत - ४७ (४१)-

-------------------चौकट------

९६ टक्के मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश

कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. शिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला जातो. २०१८ पासून मे २०२१ पर्यंत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ४१६ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. यापैकी ४०१ अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सरासरी ९६.२५ टक्के हे यश असल्याचे दिसून येते.

---------------------------------------------------------------

कोट

अल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन तपास केला जातो. अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला फौजदारांकडून तपास केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या तपासावर लक्ष असते; मात्र ९९ टक्के केसेसमध्ये ही मुले स्वत:हून अथवा प्रेम प्रकरणातून घराबाहेर पडतात. अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर संबंधितांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होते.

रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा.

------------------------------------------

( स्टार डमी क्रमांक ८४३)