शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ...

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड वर्षाच्या कालावधीत १४३ मुली घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १० मुलींचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचा शोध बाल सहाय्य पोलीस पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून केला जात आहे.

औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना अल्पवयीन म्हणून ओळखले जाते. या वयात त्यांना फारशी समज नसते. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. तर काही जण मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेतात. तर काही मुली स्वत:हून घरातून निघून जातात. मुलींना वाममार्गाला लावणारे लोकही मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून घरातून पळवून नेतात. अशा वेगवेगळ्या कारणातून शहरात गतवर्षी २०२० मध्ये ९६ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ९२ मुलींचा शोध लावण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४७ मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. यापैकी ४१ मुलींचा शोध पोलिसांनी लावला.

--------------------

आलेख

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली आणि कंसात सापडलेल्या मुलींची संख्या

वर्ष

२०१८- १४० (१३८)

२०१९- १३३- (१३०)

२०२०- ९६- (९२)

मे २०२१ पर्यंत - ४७ (४१)-

-------------------चौकट------

९६ टक्के मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश

कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. शिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला जातो. २०१८ पासून मे २०२१ पर्यंत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ४१६ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. यापैकी ४०१ अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सरासरी ९६.२५ टक्के हे यश असल्याचे दिसून येते.

---------------------------------------------------------------

कोट

अल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन तपास केला जातो. अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला फौजदारांकडून तपास केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या तपासावर लक्ष असते; मात्र ९९ टक्के केसेसमध्ये ही मुले स्वत:हून अथवा प्रेम प्रकरणातून घराबाहेर पडतात. अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर संबंधितांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होते.

रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा.

------------------------------------------

( स्टार डमी क्रमांक ८४३)