शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरोनाकाळात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ...

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड वर्षाच्या कालावधीत १४३ मुली घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १० मुलींचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचा शोध बाल सहाय्य पोलीस पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून केला जात आहे.

औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना अल्पवयीन म्हणून ओळखले जाते. या वयात त्यांना फारशी समज नसते. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. तर काही जण मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेतात. तर काही मुली स्वत:हून घरातून निघून जातात. मुलींना वाममार्गाला लावणारे लोकही मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून घरातून पळवून नेतात. अशा वेगवेगळ्या कारणातून शहरात गतवर्षी २०२० मध्ये ९६ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ९२ मुलींचा शोध लावण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४७ मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. यापैकी ४१ मुलींचा शोध पोलिसांनी लावला.

--------------------

आलेख

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली आणि कंसात सापडलेल्या मुलींची संख्या

वर्ष

२०१८- १४० (१३८)

२०१९- १३३- (१३०)

२०२०- ९६- (९२)

मे २०२१ पर्यंत - ४७ (४१)-

-------------------चौकट------

९६ टक्के मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश

कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. शिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला जातो. २०१८ पासून मे २०२१ पर्यंत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ४१६ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. यापैकी ४०१ अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सरासरी ९६.२५ टक्के हे यश असल्याचे दिसून येते.

---------------------------------------------------------------

कोट

अल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन तपास केला जातो. अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला फौजदारांकडून तपास केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या तपासावर लक्ष असते; मात्र ९९ टक्के केसेसमध्ये ही मुले स्वत:हून अथवा प्रेम प्रकरणातून घराबाहेर पडतात. अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर संबंधितांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होते.

रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा.

------------------------------------------

( स्टार डमी क्रमांक ८४३)