शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘उच्चदाब’ ग्राहकांमध्ये घट

By admin | Updated: May 4, 2016 00:08 IST

बीड : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे.

महावितरणला फटका : दुष्काळाचा परिणाम ग्राहक संख्येवरबीड : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. सर्रास जिनिंग उद्योग बंद झाल्याने उच्चदाब ग्राहकांनी कनेक्शन कायमस्वरूपी, तर काहींनी तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहेत. वर्षभरात १६ ग्राहकांनी उच्चदाब वाहिनीवरील वीज जोडणी बंद केली आहे.बीड विभागात कृषीपंप व घरगुती ग्राहकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही विभागातील ग्राहकांपेक्षा औद्योगिक ग्राहकांची वसुली चोख असल्याने त्याचा फायदा विभागाला होतो; मात्र दिवसेंदिवस खालावत चालेली ग्राहकांची संख्या विभागाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. २०१४-१५ साली उच्चदाब ग्राहकांची संख्या १८२ ऐवढी होती. त्यापैकी १६ ग्राहकांनी कायमची वीजजोडणी बंद केली आहे, तर ४० ग्राहक फक्त हंगामात वीजजोडणी करीत असल्याने महिन्याकाठच्या वसुलीत मोठी तफावत झाली आहे. १०० के.व्ही.पेक्षा अधिक भार असलेल्या जिनिंग, आॅईल मिल, साखर कारखाने, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या उच्चदाब वाहिनीवर आहेत. यंदा केवळ चार स्टोन क्रशरच्या ग्राहकांनी उच्चदाब वाहिनीवर कनेक्शन घेतले आहेत. वर्षाकाठी ग्राहकांनी व्यवसायाचा हंगामाचा कालावधी महावितरण कार्यालयाकडे सुपुर्द केल्यास त्या कालावधीमधील बिले अदा करणे हे ग्राहकांवर बंधनकारक असते. त्यामुळे महिन्याकाठी कमीत कमी ११ हजार रुपयांचे बिल भरावे लागते. या भीतीपोटी ग्राहकांची संख्या कमी होत आहे. दरवर्षी मार्च- एप्रिल महिन्यात उच्चदाब ग्राहकांनी हंगाम कालावधी महावितरणकडे देणे आवश्यक असते. त्यानुसार हंगामाचा कालावधी वाढला तरी नियमित महिन्याकाठचे बिल ग्राहकांना भरावे लागते. (प्रतिनिधी)उपाय : या तरतुदींचा ग्राहकांना फायदाठरवून दिलेल्या हंगाम कालावधीपेक्षा कमी कालावधी भरला तर ग्राहकांना विनाकारण अधिकचे बील अदा करावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी कमी कालावधीच तर फायद्याचे राहील.सध्या ही प्रक्रीया महावितरण कार्यालयात सूरु असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे अवाहन उपकार्यकारी अभियंता पी.एम. राख यांनी केले.