शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील अनेक अध्यासने झाल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या निर्मितीचा उद्देश साध्य झाला नसल्याचा ठपका ‘अध्यासन केंद्र पुनर्रचना समितीने ठेवला असला, तरी अशी अध्यासने बंद करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही कुलगुरूंनी केलेले नाही.

राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत. या महापुरुषांच्या जीवन कार्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली. अस्तित्वात असलेल्या अध्यासनांमध्ये गौतम बुद्ध अध्यासन केंद्र, महात्मा फुले अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, महात्मा गांधी अध्यासन केंद्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, शाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र, सी.व्ही. रामानुजन संशोधन केंद्र, ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, आद्य कवी मुकुंदराज अध्यासन केंद्र, वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्था अशी १८ अध्यासन केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी वर्षभरात प्रामुख्याने ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र या व अन्य एक- दोन अशा बोटावर मोजता येतील एवढ्याच अध्यासनांकडून कृती कार्यक्रम राबविण्यात आले. अन्य अध्यासनांनी फक्त जयंती व पुण्यतिथीशिवाय फारसे काही केलेले दिसत नाही.

अध्यासनांमार्फत पीएच.डी. व एम.फील.च्या माध्यमातून संशोधनाचे काम व्हावे, हा हेतू आहे. यासाठी विद्यापीठ निधीतून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास दरमहा सहा हजार रुपये, तर एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यास चार हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते. फेलोशिप मिळते म्हणून संशोधन करायचे, हा पायंडाही बऱ्यापैकी रूढ झाला आहे. आतापर्यंत झालेले संशोधन किती समाजोपयोगी पडले, हाही संशोधनाचा विषय आहे, असे विद्यापीठाचे प्राध्यापक खासगीत बोलताना प्रश्न करतात. दुसरीकडे, प्रती अध्यासन केंद्रास एक लाख

रुपयांचे अनुदान दिले जाते. हा निधी अत्यंत अपुरा असल्यामुळे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय चर्चासत्रे कशी आयोजित करणार, असा प्रश्न संचालकांनी उपस्थित केला आहे.

चौकट.....

अध्यासनांचा हेतूच सफल झाला नाही

अध्यासन केंद्र पुरर्रचना समितीचे अध्यक्ष राजेश करपे म्हणाले की, ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्र सोडले, तर अन्य एकाही केंद्राला यूजीसीचे अनुदान मिळत नाही. विद्यापीठाकडून अनुदान मिळते ते अत्यल्प आहे. असे असले तरीही ज्या पद्धतीने महापुरुषांच्या विचार-कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही. संचालकांनी पुढाकार घेऊन समाजापुढे निर्माण झाले प्रश्न सोडविण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजेत.