शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील अनेक अध्यासने झाल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या निर्मितीचा उद्देश साध्य झाला नसल्याचा ठपका ‘अध्यासन केंद्र पुनर्रचना समितीने ठेवला असला, तरी अशी अध्यासने बंद करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही कुलगुरूंनी केलेले नाही.

राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत. या महापुरुषांच्या जीवन कार्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली. अस्तित्वात असलेल्या अध्यासनांमध्ये गौतम बुद्ध अध्यासन केंद्र, महात्मा फुले अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, महात्मा गांधी अध्यासन केंद्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, शाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र, सी.व्ही. रामानुजन संशोधन केंद्र, ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, आद्य कवी मुकुंदराज अध्यासन केंद्र, वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्था अशी १८ अध्यासन केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी वर्षभरात प्रामुख्याने ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र या व अन्य एक- दोन अशा बोटावर मोजता येतील एवढ्याच अध्यासनांकडून कृती कार्यक्रम राबविण्यात आले. अन्य अध्यासनांनी फक्त जयंती व पुण्यतिथीशिवाय फारसे काही केलेले दिसत नाही.

अध्यासनांमार्फत पीएच.डी. व एम.फील.च्या माध्यमातून संशोधनाचे काम व्हावे, हा हेतू आहे. यासाठी विद्यापीठ निधीतून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास दरमहा सहा हजार रुपये, तर एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यास चार हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते. फेलोशिप मिळते म्हणून संशोधन करायचे, हा पायंडाही बऱ्यापैकी रूढ झाला आहे. आतापर्यंत झालेले संशोधन किती समाजोपयोगी पडले, हाही संशोधनाचा विषय आहे, असे विद्यापीठाचे प्राध्यापक खासगीत बोलताना प्रश्न करतात. दुसरीकडे, प्रती अध्यासन केंद्रास एक लाख

रुपयांचे अनुदान दिले जाते. हा निधी अत्यंत अपुरा असल्यामुळे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय चर्चासत्रे कशी आयोजित करणार, असा प्रश्न संचालकांनी उपस्थित केला आहे.

चौकट.....

अध्यासनांचा हेतूच सफल झाला नाही

अध्यासन केंद्र पुरर्रचना समितीचे अध्यक्ष राजेश करपे म्हणाले की, ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्र सोडले, तर अन्य एकाही केंद्राला यूजीसीचे अनुदान मिळत नाही. विद्यापीठाकडून अनुदान मिळते ते अत्यल्प आहे. असे असले तरीही ज्या पद्धतीने महापुरुषांच्या विचार-कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही. संचालकांनी पुढाकार घेऊन समाजापुढे निर्माण झाले प्रश्न सोडविण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजेत.