शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नारेगाव कचरा डेपो हटावण्यासाठी नागरिकांचा एल्गार,कच-याची एक ही गाडी येऊ न देण्याचा जन आंदोलनातून केला निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:18 IST

मागील ३५ वर्षापासून मौजे मांडकी शिवारातील कचरा डेपो विरोधात परिसरातील नागरिकांनी आता वज्रमुठ आवळली असून व्यापक जनआंदोलन उभा केले आहे.

ठळक मुद्दे१९८३-८४ पासून ४४ एकर गायरान जमिनीवर मनपाने कचरा डेपो सुरू केला.नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणार होत असून, वायू, जल प्रदूषणात वाढ झाली आहे. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत असा निर्धार.

औरंगाबाद, दि.१२  : मागील ३५ वर्षापासून मौजे मांडकी शिवारातील कचरा डेपो विरोधात परिसरातील नागरिकांनी आता वज्रमुठ आवळली असून व्यापक जनआंदोलन उभा केले आहे. कच-याच्या वाढत्या ढीगा-यामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या विरोधात परिसरातील नागरिकांची हा कचरा डेपो हटवावा अशी खूप दिवसांपासूनची मागणी आहे. 

मांडकीची ४४ एकर गायरान जमीन कचरा डेपोसाठी मनपाने घेऊन पंचक्रोशीत अस्वच्छता पसरविली आहे. डेपो हटविण्याच्या हालचालीला हेतुपुरस्सर ब्रेक दिला जात आहे. आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे, असे पत्रकार परिषेदत पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक, मनोज गायके यांनी सांगितले.

१९८३-८४ पासून ४४ एकर गायरान जमिनीवर मनपाने कचरा डेपो सुरू केला. सुरुवातीला अनेक शेतक-यांनी डेपोतून कुजलेला कचरा खत म्हणून उचलूनदेखील नेला; परंतु ३५ वर्षांपासून या डेपोतील विदारक परिस्थिती व मरणयातना शेतकरी व नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन वेळा कच-यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न फक्त केंद्र शासनाचे अनुदान लाटण्यासाठी झाला. खतनिर्मिती, गॅसनिर्मिती अशी मोठी आश्वासने दाखवून जनतेला पुन्हा प्रदूषणात झोकून दिले आहे. किरकोळ वाटणा-या डेपोत ३५ वर्षांत ६० फूट उंचीचा कच-याचा डोंगर उभा राहिला असून, त्याला हटविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणार होत असून, वायू, जल प्रदूषण झाल्याने खेड्यातील नागरिकांना डोकेदुखी, त्वचारोगाचे आजार आढळून येत आहेत. 

मनपाने एकदाही आरोग्यसेवा किंवा शेजारच्या खेड्यात जनतेला सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला नाही. रस्त्याविषयी विचारले असता तो आमच्या हद्दीत येत नाही असा बहाणा मात्र केला जातो. कचरा डेपो आमच्या हद्दीत मग कशाला टाकता. तो त्वरित हटवावा, आता माघार नाही, असा निर्धार पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक यांनी केला आहे. 

शाळेत दुर्गंधीचा त्रासकचरा डेपोपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे एकूण २५० च्या जवळपास विद्यार्थी आहेत. अस्वच्छतेत त्यांना ज्ञानार्जन करावे लागते. दुर्गंधीने आरोग्य धोक्यात आले आहे. 

एकही गाडी जाऊ देणार नाही...जोपर्यंत डेपो हलविणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गुन्हे दाखल करा अन्यथा तुरंगात पाठवा, मनपाच्या ढिसाळपणाला वठणीवर आणणारच, असा इशारा उपसरपंच साईनाथ चौथे, मदन डक, जगदीश चक्कर, रियाज शाह, विष्णू भेसर, संतोष डक, सय्यद पटेल, उपसरपंच अनिल हिवर्डे, रतन काळे, भाऊसाहेब गायके आदींनी दिला आहे.