शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पर्यटन परिषद यंदा घेण्याचा निश्चय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST

पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी शासन दरबारी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल आ. अंबादास दानवे, पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चावले यांचा सत्कार ...

पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी शासन दरबारी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल आ. अंबादास दानवे, पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चावले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘टुरिझम पोटॅन्शियल ऑफ औरंगाबाद’ हे पुस्तक सत्कारमूर्तीना भेट देण्यात आले.

उद्योजक सुनीत कोठारी, मानसिंग पवार, हरप्रीत सिंग, सुनील चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, पपींद्रपाल सिंग, डॉ. दुलारी कुरेशी यांची विशेष यावेळी उपस्थिती होती.

मागील १० वर्षात शहरात पर्यटन परिषद झाली नाही, असे प्रारंभीच, मानसिंग पवार यांनी सर्वांच्या निदर्शनात आणून दिले. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा परिषदांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. डीपीसीच्या नियोजनात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, त्यासाठी दर वर्षी किंवा दोन वर्षाने एकदा अशी परिषद करता येऊ शकते, असेही त्यांनी सुचवले.

आ. दानवे यांनी आश्वासन दिले की, शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून घेऊ. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही तर मी माझ्या फंडाचा निधी देईन. अत्यावश्यक असेलच तर सर्व मिळून अशी परिषद घेता येईल, असेही नमूद केले.

औरंगाबाद टुरिझम फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी प्रास्ताविक केले.

चौकट

बुद्धगयेपासून पर्यटक थेट इथे आले पाहिजेत

उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले की, पर्यटनासाठी बुद्धगयेला जाणाऱ्या पर्यटकांना येथे येण्यासाठी आकर्षित करणे आवश्यक आहे. येथे ॲग्री टुरिझमसाठी अपेडाचे ऑफिस असणे आवश्यक आहे. मुलांसाठी मनोरंजन पार्क असावे. बॉटनिकल गार्डन, व्हर्टिकल गार्डन असावे. मोठे खेळाचे मैदान व येथे मॅच झाल्यास मोठ्या प्रमाणात लाभ होईल असे सुनीत कोठारी यांनी सुचवले.

चौकट

विकास कामे करताना अडथळे

येथे काम करत असताना थेट कोर्ट स्टे आणण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे, अशी खंत व्यक्त करत भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चावले यांनी सांगितले की, दौलताबाद किल्यावर ८ विविध कामांचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करत आहे. वेरूळ, बेबी का मकबरा येथेही अतिक्रमण अडचण आहे. पर्यटकांना फ्रेंडली वातावरण मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.