शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

अकराशे कोटींची मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: July 3, 2017 00:14 IST

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.

मारोती जुंबडे। लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१५-१६ या सलग चार वर्षांत जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस झाला. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. तसेच २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात काही भागात अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या चार वर्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला. २०१५-१६ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठीही पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनीही मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांनी बँकांकडून जवळपास १६३४ कोटींचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले.या कर्जाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खत, बियाणे विकत घेऊन पेरणी केली. त्यानंतर २०१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. परंतु, मालाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी हा माल कवडीमोल दराने खरेदी केला. त्यामुळे उत्पन्न होऊनही शेतकरी कर्जबाजारीच राहिला. परिणामी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड शेतकऱ्यांकडून झाली नाही. कर्जाचा डोंगर वाढत राहिला. जिल्ह्यातील शेतकरी बँकाचे थकबाकीदार झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आत्महत्येसारखे शेवटेच पाऊल उचलू लागला. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफीची करण्याची घोषणा शासनाने केली. २८ जून २०१७ रोजी तसा आदेशही काढला. या आदेशानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना काही निकषाच्या आधीन राहून दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बँकांचे ३० जून २०१६ पर्यंतचे थकित असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेअंतर्गत माफ होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४० हजार शेतकऱ्यांचे जवळपास ११५९ कोटी ४२ लाख ४७ हजार रुपयांचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.