शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

घाटीच्या दारातच मरणयातना

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

औरंगाबाद : घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत.

औरंगाबाद : दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडलेले अनेक जण मरणाच्या दारातून परत येण्यासाठी घाटीच्या दारात येतात अन् बरे होऊन घरीही जातात; परंतु याच घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत. आवारातून आत नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची तसदीही घाटी प्रशासन किंवा या रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या तथाकथित समाजसेवकांनी घेतलेली नाही. याच उदासीनतेमुळे बुधवारी अशाच एका निराधार वृद्धाचा उपचाराअभावी घाटीच्या दरवाजात तडफडून मृत्यू झाला व त्याच्या मृतदेहाला अक्षरक्ष: मुंग्या लागल्या...घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच शासकीय दंत महाविद्यालय आणि बाह्यरुग्ण विभागासमोर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चार अनोळखी व्यक्ती बेवारस अवस्थेत बसलेल्या दिसतात. यात दोन महिलांचाही समावेश आहे, तर अन्य एक जण अपघात विभागासमोरील समतादर्शन धर्मशाळेच्या पायऱ्यावर पायाला कपड्याने बांधून बसलेला असतो. दंत महाविद्यालयासमोरील शेडमध्ये एक मध्यम वयाचा व्यक्ती मळक्या कपड्यात बसलेला आहे. त्याच्या दोन्ही पायाची बोटे अपघातात कापल्या गेली. त्यामुळे त्यास चालताही येत नाही. घटनेनंतर कोणीतरी त्याला घाटी परिसरात आणून टाकले. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजले. मात्र, तो पूर्ण नाव आणि अचूक पत्ता सांगत नाही. अनेक दिवसांपासून तो एकाच ठिकाणी बसलेला आहे. त्याच्या शेजारी काही अंतरावर एक महिला झोपलेली असते. सडपातळ बांधा असलेली वयाची चाळिशी ओलांडलेली ही महिला जालना येथील रहिवासी आहे. दोन- चार महिन्यांपासून ती अंगावर मळका शर्ट आणि लेडीज पायजामा घालून वावरताना दिसते. सोबत मोठे गाठोडे घेऊन ती शेडखाली बसलेली असते. त्याचप्रमाणे अन्य दोन व्यक्ती त्याच शेडखाली झोपलेल्या असतात. त्या कधीही जागेवरून हालत नाहीत. अपघात विभागासमोर अनेक दिवसांपासून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला मोठी जखम झालेली आहे. या जखमेतून सतत द्रव वाहत असतो. त्यास नीट चालताही येत नाही. त्यामुळे तो रांगतच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो. सुमारे महिनाभरापासून तो अपघात विभागाशेजारी बसलेला असतो. या बेवारस अनोळखी व्यक्ती कोणालाही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. दोन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या बेवारस व्यक्तीप्रमाणे या अनोळखी व्यक्तीही उपचाराअभावी मृत्युमुखी पडू शकतात.