शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

घाटीच्या दारातच मरणयातना

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

औरंगाबाद : घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत.

औरंगाबाद : दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडलेले अनेक जण मरणाच्या दारातून परत येण्यासाठी घाटीच्या दारात येतात अन् बरे होऊन घरीही जातात; परंतु याच घाटीच्या दरवाजात पाच निराधार गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरक्ष: मरणयातना भोगत आहेत. आवारातून आत नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची तसदीही घाटी प्रशासन किंवा या रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या तथाकथित समाजसेवकांनी घेतलेली नाही. याच उदासीनतेमुळे बुधवारी अशाच एका निराधार वृद्धाचा उपचाराअभावी घाटीच्या दरवाजात तडफडून मृत्यू झाला व त्याच्या मृतदेहाला अक्षरक्ष: मुंग्या लागल्या...घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच शासकीय दंत महाविद्यालय आणि बाह्यरुग्ण विभागासमोर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चार अनोळखी व्यक्ती बेवारस अवस्थेत बसलेल्या दिसतात. यात दोन महिलांचाही समावेश आहे, तर अन्य एक जण अपघात विभागासमोरील समतादर्शन धर्मशाळेच्या पायऱ्यावर पायाला कपड्याने बांधून बसलेला असतो. दंत महाविद्यालयासमोरील शेडमध्ये एक मध्यम वयाचा व्यक्ती मळक्या कपड्यात बसलेला आहे. त्याच्या दोन्ही पायाची बोटे अपघातात कापल्या गेली. त्यामुळे त्यास चालताही येत नाही. घटनेनंतर कोणीतरी त्याला घाटी परिसरात आणून टाकले. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजले. मात्र, तो पूर्ण नाव आणि अचूक पत्ता सांगत नाही. अनेक दिवसांपासून तो एकाच ठिकाणी बसलेला आहे. त्याच्या शेजारी काही अंतरावर एक महिला झोपलेली असते. सडपातळ बांधा असलेली वयाची चाळिशी ओलांडलेली ही महिला जालना येथील रहिवासी आहे. दोन- चार महिन्यांपासून ती अंगावर मळका शर्ट आणि लेडीज पायजामा घालून वावरताना दिसते. सोबत मोठे गाठोडे घेऊन ती शेडखाली बसलेली असते. त्याचप्रमाणे अन्य दोन व्यक्ती त्याच शेडखाली झोपलेल्या असतात. त्या कधीही जागेवरून हालत नाहीत. अपघात विभागासमोर अनेक दिवसांपासून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला मोठी जखम झालेली आहे. या जखमेतून सतत द्रव वाहत असतो. त्यास नीट चालताही येत नाही. त्यामुळे तो रांगतच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो. सुमारे महिनाभरापासून तो अपघात विभागाशेजारी बसलेला असतो. या बेवारस अनोळखी व्यक्ती कोणालाही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. दोन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या बेवारस व्यक्तीप्रमाणे या अनोळखी व्यक्तीही उपचाराअभावी मृत्युमुखी पडू शकतात.