शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

By admin | Updated: January 17, 2017 23:11 IST

ज्ाालना : मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ज्ाालना : एमआयडीसी परिसरातील कैलास शटर येथील चंद्रकांत पाईकराव (४५) यांनी मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शहरातील जुन्या जालना परिसरात असलेल्या या मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती परिसरात व्यक्त होऊ लागली आहे. मोतीबाग हे नगरपालिकेचे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानाच्या पाठिमागे निसर्गरम्य असा मोती तलाव आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी नगरपलिकेने यंदा या तलावातील गाळही काढला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात मुबलक पाणीासाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या बोअरची पाणीपातळी वाढली आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने या तलावाच्या कडेला कसलेही संरक्षण नसल्यामुळे हा तलाव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात तिघांनी या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यात यशवंतनगर येथील तरूण मयूर वाघ, एका महिला आणि मंगळवारी चंद्रकांत पाईकराव यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या तलावामध्ये ४० जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती परिसरातील दुकानदार सांगत आहेत. सरक्षण भींत नसल्याने सहज तलावात उडी घेता येत असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, मयुर वाघ हा आत्महत्या करण्यापूर्वी या परिसरात काही काळ फिरत होता, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले. त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर फिरत असलेलाच हा मुलगा असल्याने आपणाला धक्का बसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तलावाला सरंक्षण भींत असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनांना पालिका कितपत गांभिर्याने घेऊन सुरक्षिततेबाबत कार्यवाही करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष आहे.