शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

By admin | Updated: January 17, 2017 23:11 IST

ज्ाालना : मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ज्ाालना : एमआयडीसी परिसरातील कैलास शटर येथील चंद्रकांत पाईकराव (४५) यांनी मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शहरातील जुन्या जालना परिसरात असलेल्या या मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती परिसरात व्यक्त होऊ लागली आहे. मोतीबाग हे नगरपालिकेचे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानाच्या पाठिमागे निसर्गरम्य असा मोती तलाव आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी नगरपलिकेने यंदा या तलावातील गाळही काढला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात मुबलक पाणीासाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या बोअरची पाणीपातळी वाढली आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने या तलावाच्या कडेला कसलेही संरक्षण नसल्यामुळे हा तलाव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दीड महिन्यात तिघांनी या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यात यशवंतनगर येथील तरूण मयूर वाघ, एका महिला आणि मंगळवारी चंद्रकांत पाईकराव यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या तलावामध्ये ४० जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती परिसरातील दुकानदार सांगत आहेत. सरक्षण भींत नसल्याने सहज तलावात उडी घेता येत असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, मयुर वाघ हा आत्महत्या करण्यापूर्वी या परिसरात काही काळ फिरत होता, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले. त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर फिरत असलेलाच हा मुलगा असल्याने आपणाला धक्का बसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तलावाला सरंक्षण भींत असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनांना पालिका कितपत गांभिर्याने घेऊन सुरक्षिततेबाबत कार्यवाही करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष आहे.