शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मृत सरी अवर्षणावर 'मात' करी़़़़

By admin | Updated: July 7, 2014 00:12 IST

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील पिकांना पावसाचा ताण सहन होऊन जोमदार पीक येण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे़

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील पिकांना पावसाचा ताण सहन होऊन जोमदार पीक येण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे़ पेरणी करताना मृत सरी तयार करून पेरणी केली तर त्या सरीमध्ये वीस टक्के पाणीसाठा धारण करण्याची क्षमता असते़, असे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे़ त्यामुळे मृत सरी अवर्षणावर 'मात' करी असा अनुभव पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे़खरीप हंगामात प्रत्येक वर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यात पाऊस मोठा ताण देतो़ त्यामुळे पेरणी नंतर उगवलेली कोवळी पिके कोमेजून जात आहेत़ त्यामुळे उत्पादनावरसुध्दा मोठा परिणाम होत आहे़ यासाठी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी डी़बी़सुतार, अनंत गायकवाड यांनी चालू वर्षातील खरीप हंगामापूर्वी मृत सरीद्वारे पेरणी करण्याचा पथदर्शी उपक्रम सुरू केला असून, ठराविक अंतरावर मृत सरी काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे़ शिवाय या सरीमध्ये वीस टक्के जादा पाणीसाठा साठवून ठेवण्याची क्षमता असते़ त्यामुळे पावसाने ताण दिल्यानंतर त्याचा कोवळ्या पिकांना मोठा फायदा होतो़अशी सोडावी सरी़़़चार ओळी पेरणी केल्यानंतर एक पूर्ण ओळ रिकामी सोडावी़ या रिकाम्या (मृत) सरीत इतर जमीनी पेक्षा २० टक्के पाणीसाठा धारण करण्याची क्षमता असते़ जेव्हा-केव्हा पाऊस लांबतो किंवा मोठा ताण देतो तेव्हा रिकाम्या (मृत) सरीतील साठलेल्या पाण्याचा कोवळ्या पिकांसाठी उपयोग होतो़ परिणामी, पावसाने ताण देऊनसुध्दा पिके जीवंत राहतात़या मृत सरीचा पावसाने ताण दिल्यानंतर तर फायदा होतोच त्याचबरोबर पाऊस जादा झाला तरीसुध्दा अधिकचे पाणी ओसरून पाण्याचा निचरा होण्यासाठीसुध्दा मृतसरी उपयुक्त ठरतात़ एकंदर या तंत्राचा दुहेरी फायदा होतो़ त्यामुळे मृत सरी अवर्षणावर 'मात' करी असे तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे़