शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा कहर... अधिकाऱ्यांना नाही खबर..!

By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST

लातूर : डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे़़ त्यामुळे उपचारासाठी खाजगीबरोबरच सरकारी दवाखान्यात गर्दी होत आहे़

लातूर : डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे़़ त्यामुळे उपचारासाठी खाजगीबरोबरच सरकारी दवाखान्यात गर्दी होत आहे़ परंतु, गेंड्याच्या कातडीची सरकारी यंत्रणा हलायचे नाव घेत नाही. कारण हिवताप अधिकाऱ्यांच्या दप्तरी जिल्ह्यात दोन महिन्यांत डेंग्यू झालेल्या रुग्णांचा आकडा शून्य आहे. अगदी परवा दिवशी डेंग्यूने मृत्यू झालेल्या अक्षता बालाजी अलगुले हिची सुद्धा डेंग्यू झाल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी वा मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे नाही. खाजगी रुग्णालयात दाखल होऊन निदान झालेल्या नोंदी शासकीय यंत्रणा स्वीकारायला तयार नाही. खाजगीचे जाऊ द्या; परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात डेंग्यूमुळे दाखल झालेल्या व निदान झालेल्या रुग्णांची नोंदही आरोग्य विभागाकडे नाही. आरोग्य उपसंचालक कार्यालय असलेल्या लातूरमधील उदासिनतेचे हे विदारक दृश्य आहे.जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्यांत शहरी भागातील डेंग्यू रुग्णांची संख्या निरंक असल्याचे कळविले आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत खुद्द शासकीय सर्वोपचार रुग्णालयात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळल्याची नोंद आहे. एका शासकीय रुग्णालयात ११ रुग्ण असताना हिवताप अधिकाऱ्याचा अहवाल निरंक कसा, असा प्रश्न आहे. शिवाय, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची शासकीय तपासणी केंद्रात रक्त तपासणी करण्याची कोणतीही यंत्रणा आरोग्य विभागाकडून राबविली जात नाही. ४खाजगी रुग्णालयातील रुग्णांचा अहवाल जिल्हा हिवताप अधिकारी गृहित धरीत नाहीत. त्यामुळे या नोंदी शासकीय दप्तरी होत नाहीत. हे होण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल आरोग्य विभाग उचलत नाही. ४आजमितीला जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांची संख्या ३० हून अधिक आहे. प्रत्येक रुग्णालयात चौकशी केली, तर डेंग्यूचे दहापेक्षा जास्त रुग्ण दाखल झाल्याची नोंद सर्रास आढळते. डेंग्यूसदृश आजाराचा हाच आकडा तीनशेच्या पुढे जातो. केवळ सरकारी ताळमेळ नसल्याने याच्या नोंदी होत नाहीत की, या नोंदी नोंदवून आरोग्य खात्याचे काम वाढेल या भीतीने त्या मुद्दामहून घेतल्या जात नाहीत. याबाबत संशय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शहर व परिसरातील भागांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखीचे रुग्ण आढळून येत आहेत़ शहरातील विविध खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात साथरोगाने पीडित असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत़ तर डेंग्यूचे ११ रुग्ण उपचार घेत होते़ तर डेंग्यू संशयित म्हणून १९ जण सध्या उपचार घेत आहेत़ रविवारी एका ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे़ जिल्ह्यात अनेक गावात तापीचे रुग्ण वाढले आहेत़ जानेवारी ते आॅक्टोबर या महिन्यात जिल्ह्यात ९०१ घरे दूषित आढळून आले़ तसेच १२६७ दूषित कन्टेनर आढळून आले़ त्यापैकी ६७ कन्टेनर रिकामे करण्यात आले़ यात तांदुळजा, जानवळ, वडवळ, साकोळ, दैठणा यांचा समावेश आहे़ या साथरोग गावातील एकूण ७१ तापाचे रुग्ण आले होते़ त्यापैकी २४ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता, ११ रक्तजल नमुने डेंग्यू दूषित आढळून आले़ भादा, अलमतांडा, खरोळा, हाकेतांडा, नळेगाव, बनसावरगाव येथे ४३ घरे दूषित आढळून आले़ या साथग्रस्त गावातील एकूण ७५ रुग्ण आढळून आले़ त्यापैकी २१ जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले़ ११ रक्तजल नमुने चिकुनगुनिया दूषित आढळून आले़ तर लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी, वाढवणा, गाझीपुरा, वाढवण्यातील एका रुग्णाचा साथ रोगाने मृत्यूही झाला आहे़ तर लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी व गाझीपुरा भागातील एक-एक असे दोन रुग्णांचा साथ रोगाने मृत्यू झाला आहे़ लातूर शहरी व ग्रामीण भागातील आतापर्यंत २१६ डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ त्यात शहरातील २० व ग्रामीण भागातील ३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याने ५५ रुग्ण आढळून आले़ तर चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले़ तर ७१ रुग्ण डेंग्यू व १६ चिकुनगुनियाचे असे ७१ रुग्ण असल्याचे जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे़ याशिवाय जिल्ह्यात विविध खाजगी व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत़ पण जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नांदेड येथील प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ज्या रुग्णाचे रक्तजल नमुने दूषित आहेत, तेच ग्राह्य मानले जातात़ अन्य प्रयोगशाळेचे रिर्पोट्स डेंग्यू पॉझिटिव्ह असले तरी ते ग्राह्य मानले जात नाहीत़ (प्रतिनिधी)