शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पुराचा धोका

By admin | Updated: January 15, 2016 00:18 IST

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सोबचत पुराचा धोका वाढण्याची भीती असल्याचे मत वाचकांनी सर्व्हेक्षणातून नोंदविले. नद्यांमधील अतिक्रमणाबाबत लोकमतने प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यात वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. या वाचकांना नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पाच प्रश्न विचारण्यात आले. यात होय, नाही, माहीत नाही या स्वरूपात उत्तरे द्यावयाची होती. यात प्रामुख्याने नद्यांमधील अतिक्रमणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के वाचकांनी होय उत्तर दिले. १० टक्के नाही तर २० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. एकूणच तब्बल ७० नागरिकांना या अतिक्रमणाचे परिणाम स्पष्ट दिसतात. नद्यांमधील अतिक्रमणाकडे पालिकेसोबतच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे? यावर ८० वाचकांनी पालिका तसेच प्रशासनावर खापर फोडून होय असे उत्तर दिले. पाच टक्के वाचकांना प्रशासनाचा दोष वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढतो का? या प्रश्नावर ६५ टक्के नागरिकांना वाटते धोका वाढतो. १० टक्के म्हणतात नाही तर ५ टक्के वाचकांना माहीत नाही. नद्यांमधील अतिक्रमाणास राजकीय वरदहस्त आहे का? या प्रश्नावर ४० टक्के वाचक होय म्हणतात. २० टक्के नाही म्हणतात. तर तब्बल ४० टक्के वाचकांनी नाही म्हणून या प्रश्नावर बोलणे टाळले. नद्यांमधील अतिक्रमणाबाबत पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे वाटते का? या प्रश्नावर ७० टक्के वाचक होय म्हणतात.२० टक्के वाचकांचे नाही असे उत्तर आले तर १० टक्के वाचकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. या प्रश्नांसोबतच नागरिकांनी अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी नदीक्षेत्रात जाऊ नये असे सुचविले. काही नागरिक मुद्दाहून येथे अतिक्रमण करतात. यामुळे पालिका अथवा इतर प्रशासनही काही करू शकत नाही. नदी प्रवाह व पर्यावरण पाहता नदीपात्रात झालेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढले पाहिजे अशी प्रतिक्रियाही वाचकांनी या सर्व्हे दरम्यान दिली. (प्रतिनिधी) जालना शहरातून वाहणाऱ्या सिना व कुंडलिका नदीपात्रातील दोन्ही बाजूस तसेच पात्रातही काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मोठे पथक घेऊन अतिक्रमणा पाहणी केली. नकाशा तसेच अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही अतिक्रमण जैसे थेच आहे. नद्यांमधील अतिक्रमण आहे तसेच आहे. जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी नगर पालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे सीना व कुंडलिका नद्यांमध्ये कच्च्या सोबतच पक्के बांधकाम होत आहेत. काही ठिकाणी पक्की घरेसुद्धा बांधण्यात आलेली आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही या अतिक्रमणाचा अहवाल सादर केल्यानंतरही नद्यांमधील अतिक्रमण जैसे थेच आहेत.