शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

धोकादायक वसाहती?

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास डोंगराचा संपूर्ण कडाच कोसळला. अंदाजे ८०० लोकवस्तीचे हे संपूर्ण गाव गाडले गेले.

संतोष हिरेमठ, औरंगाबादपुणे जिल्ह्यातील माळीण गावावर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास डोंगराचा संपूर्ण कडाच कोसळला. अंदाजे ८०० लोकवस्तीचे हे संपूर्ण गाव गाडले गेले. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर परिसरात डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींचा घेतलेला हा आढावा.औरंगाबाद शहराच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत. गेल्या काही वर्षांत शहराची ओळख सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर म्हणून होत आहे. सातारा, देवळाई, कांचनवाडी, भावसिंगपुरा, हर्सूल अशा बाजूंनी शहर वाढतच आहे. शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. उंच इमारती उभ्या राहिल्या. निसर्गाच्या अगदी जवळ डोंगराच्या पायथ्याशी आणि रम्य वातावरणातील या वसाहती सर्वांचे लक्ष वेधून घेतात; पण त्या किती सुरक्षित आहेत?डोंगरांवरील वृक्षांचे महत्त्वडोंगररांगांमध्ये झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडांची मुळे माती धरून ठेवतात. परंतु वृक्षतोडीमुळे माती मोकळी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डोंगररांगांत वृक्षारोपण वाढले पाहिजे. शहराजवळील डोंगररांगांत पाषाणाचे प्रमाण अधिक आहे. तसेच आपल्याकडे पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे माळीण गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. परंतु ढगफुटी अथवा अधिक पाऊस पडला तर परिसरातील काही वसाहतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. मुळे यांनी सांगितले.डोंगर पोखरुन प्लॉटिंगजटवाडा रोडवर हळूहळू डोंगराच्या पायथ्याशी वसाहती निर्माण होत आहे. डोंगर पोखरण्याचा प्रकार इथे सुरु आहे. सातारा आणि देवळाई परिसरातील डोंगराच्या पायथ्याशीही आता प्लॉटिंग होऊ लागली आहे. भविष्यात याठिकाणीही वसाहती निर्माण होणार आहेत.खोदकाम अन् वृक्षतोडडोंगराच्या पायथ्याशी ठिकठिकाणी माती, मुरूम खोदला जात आहे. डोंगरावरील वृक्षतोडही दिसते. पर्यावरण आणि तेथील वसाहतींसाठी ही बाब धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.मोठमोठ्या दगडांचा धोकाशहराजवळील डोंगरांच्या उतारावर अनेक ठिकाणी मोठे दगड उभे दिसतात. अनेक ठिकाणी अगदी घरांच्या बाजूला मोठे दगड पडलेले दिसतात. डोंगराच्या कडेला राहणारे याबद्दल चिंता व्यक्त करतात.डोंगरपायथ्याशी वसाहतीभावसिंगपुरा परिसरातील निसर्ग कॉलनी, कमलनगर, आदर्श कॉलनी, शाक्यनगरसह विविध भाग डोंगराच्या पायथ्याशी आहे. शहराजवळील सातारा गाव, सातारा परिसरातील सुधाकरनगरसह डोंगराजवळ वसाहती झाल्या आहेत. ठिकठिकाणी उंच इमारतींची बांधकामे सुरू आहेत. कोठे घरांचे बांधकाम झाले तरी तेथे राहायला कोणी आलेले नाही.